राजघाटावर पोहोचले पंतप्रधान मोदी, राष्ट्रपिता महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली: आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी यांची जयंती देशभर मोठ्या आदराने साजरी होत आहे. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील राजघाट येथे महात्मा गांधींच्या समाधीवर जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.


पंतप्रधान मोदींनी राजघाटावर पुष्पांजली अर्पण करून राष्ट्रपिता महात्मा गांधींना नमन केले. यावेळी उपराष्ट्रपती आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते.


पंतप्रधानांनी त्यांच्या 'X' खात्यावर पोस्ट करून बापूंच्या स्मृतींना वंदन केले. त्यांनी लिहिले की, "गांधी जयंती हा प्रिय बापूंना त्यांच्या अलौकिक जीवनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. त्यांच्या आदर्श विचारांनी मानवी इतिहासाची दिशा बदलली. त्यांनी दाखवून दिले की धैर्य आणि साधेपणाच्या बळावर मोठे बदल कसे घडवता येतात. विकसित भारत निर्माण करण्याच्या आमच्या कार्यात आम्ही त्यांच्याच मार्गावर चालत राहू."


 


याशिवाय, पंतप्रधान मोदींनी आज माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विजय घाट येथे जाऊन त्यांनाही आदरांजली वाहिली. देशभरात आज महात्मा गांधी यांची १५६ वी जयंती साजरी होत असून, संपूर्ण देश बापूंच्या सेवा आणि करुणा या मूल्यांचे स्मरण करत आहे.

Comments
Add Comment

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर