राजघाटावर पोहोचले पंतप्रधान मोदी, राष्ट्रपिता महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली: आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी यांची जयंती देशभर मोठ्या आदराने साजरी होत आहे. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील राजघाट येथे महात्मा गांधींच्या समाधीवर जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.


पंतप्रधान मोदींनी राजघाटावर पुष्पांजली अर्पण करून राष्ट्रपिता महात्मा गांधींना नमन केले. यावेळी उपराष्ट्रपती आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते.


पंतप्रधानांनी त्यांच्या 'X' खात्यावर पोस्ट करून बापूंच्या स्मृतींना वंदन केले. त्यांनी लिहिले की, "गांधी जयंती हा प्रिय बापूंना त्यांच्या अलौकिक जीवनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. त्यांच्या आदर्श विचारांनी मानवी इतिहासाची दिशा बदलली. त्यांनी दाखवून दिले की धैर्य आणि साधेपणाच्या बळावर मोठे बदल कसे घडवता येतात. विकसित भारत निर्माण करण्याच्या आमच्या कार्यात आम्ही त्यांच्याच मार्गावर चालत राहू."


 


याशिवाय, पंतप्रधान मोदींनी आज माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विजय घाट येथे जाऊन त्यांनाही आदरांजली वाहिली. देशभरात आज महात्मा गांधी यांची १५६ वी जयंती साजरी होत असून, संपूर्ण देश बापूंच्या सेवा आणि करुणा या मूल्यांचे स्मरण करत आहे.

Comments
Add Comment

Air India Airlines : एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची पश्चिम आशियातून ४२ विमानसेवा सुरु होणार

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, टाटाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या पश्चिम

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये