राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द



मुंबई : राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळी दरम्यान दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, यंदा राज्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती लक्षात घेऊन अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

यंदा केंद्र सरकारने जीएसटी संदर्भात घेतलेले निर्णय नवरात्रीपासून लागू झाली आहे. आता पाच आणि अठरा टक्के असे जीएसटीचे दोनच टप्पे अस्तित्वात आहेत. जीएसटीचे बारा आणि अठ्ठावीस टक्के हे दोन टप्पे रद्द करण्यात आले आहेत. शैक्षणिक साहित्य, निवडक औषधे आणि निवडक दुग्धजन्य पदार्थ आदींवर शून्य टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय झाला आहे. इतर ज्या वस्तू आणि सेवांवर आधी बारा टक्के जीएसटी होता त्यांच्यावर आता पाच टक्के जीएसटी आहे. तसेच ज्या ज्या वस्तू आणि सेवांवर आधी अठ्ठावीस टक्के जीएसटी होता त्यांच्यावर आता बारा टक्के जीएसटी आहे. यामुळे दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू आणि सेवा स्वस्त झाल्या आहेत. या नंतर आता पुराच्या निमित्ताने राज्यातली एसटी भाडेवाढ रद्द झाली आहे. या दोन निर्णयांमुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि