कॅनडाने लॉरेंस बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना जाहीर केले

ओटावा : कॅनडाने लॉरेंस बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. भारतासोबतचे संबंध सुधारत असतानाच कॅनडाने हे पाऊल उचलले आहे. कॅनडा सरकारने हा निर्णय कंझर्व्हेटिव्ह आणि एनडीपी नेत्यांच्या मागणीनंतर घेतला आहे.


गेल्या वर्षी आरसीएमपी (रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस) यांनी असा आरोप केला होता की, बिश्नोई टोळी कॅनडामधील खलिस्तान समर्थकांना लक्ष्य करत आहे. मात्र भारताने हे आरोप फेटाळले होते.भारतासोबत संबंध सुधारण्याच्या पार्श्वभूमीवरच कॅनडाने हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. कंझर्व्हेटिव्ह आणि एनडीपी नेत्यांच्या दबावानंतर हा ठराव झाला.


आरसीएमपीच्या म्हणण्यानुसार, भारत बिश्नोई टोळीचा वापर कॅनडामधील लोकांवर विशेषतः खलिस्तान या वेगळ्या शीख राष्ट्राची मागणी करणाऱ्यांवर हल्ले करण्यासाठी, खून करण्यासाठी आणि खंडणी वसूल करण्यासाठी करत होता. तथापि, भारत सरकारने या सर्व आरोपांचा स्पष्टपणे इन्कार केला आहे आणि सांगितले आहे की ओटावा सरकारसोबत मिळून ही टोळी रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे.द कॅनेडियन प्रेसनुसार, सेंटर फॉर इंटरनॅशनल गव्हर्नन्स इनोव्हेशनचे वरिष्ठ फेलो वेस्ली वॉर्क यांनी पूर्वी म्हटले होते की, या टोळीला दहशतवादी यादीत टाकल्याने फारसा फरक पडणार नाही, कारण कॅनडाची मुख्य समस्या म्हणजे गुन्हेगारी गुप्त माहिती गोळा करण्याची मर्यादित क्षमता होय.

Comments
Add Comment

AAP Sarpanch Shot in Amritsar : अमृतसरमध्ये थरार! लग्नमंडपात घुसून 'आप' नेत्याची डोक्यात गोळी झाडून हत्या; अवघ्या १३ सेकंदात आरोपी पसार

चंदीगड : पंजाबमध्ये गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना अमृतसरमध्ये घडली

आसाममध्ये भल्या पहाटे भूकंप! नागरिकांची उडाली धावपळ; वाचा सविस्तर

गुवाहाटी : आसाममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

PM modi on Somnath Temple : विध्वंस नव्हे, हा तर स्वाभिमानाचा विजय! सोमनाथच्या १००० वर्षांच्या अढळ विश्वासावर पंतप्रधान मोदींचा विशेष लेख

पाटण : गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले आणि कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सोमनाथ मंदिरावर

एक लाख 'ड्रोन वॉरियर्स'सह 'भैरव स्पेशल फोर्स' सज्ज

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; भारतीय लष्कराची झेप नवी दिल्ली : आधुनिक युद्धशास्त्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवत

कुटुंबातील घट्ट नाती ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना रोखू शकतात: मोहन भागवत

भोपाळ : एका कुटुंबात पालक आणि मुलांमधील संवाद आणि त्यांच्यातील घट्ट नाते लव्ह जिहादसारख्या घटना रोखू शकतात.

‘एक्स’वर महिलांचे आक्षेपार्ह फोटो, 'एआय'च्या गैरवापराबद्दल खासदारांचं मोदी सरकारला पत्र!

नवी दिल्ली : शिवसेना (उबाठा)च्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकतेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि