कॅनडाने लॉरेंस बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना जाहीर केले

ओटावा : कॅनडाने लॉरेंस बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. भारतासोबतचे संबंध सुधारत असतानाच कॅनडाने हे पाऊल उचलले आहे. कॅनडा सरकारने हा निर्णय कंझर्व्हेटिव्ह आणि एनडीपी नेत्यांच्या मागणीनंतर घेतला आहे.


गेल्या वर्षी आरसीएमपी (रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस) यांनी असा आरोप केला होता की, बिश्नोई टोळी कॅनडामधील खलिस्तान समर्थकांना लक्ष्य करत आहे. मात्र भारताने हे आरोप फेटाळले होते.भारतासोबत संबंध सुधारण्याच्या पार्श्वभूमीवरच कॅनडाने हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. कंझर्व्हेटिव्ह आणि एनडीपी नेत्यांच्या दबावानंतर हा ठराव झाला.


आरसीएमपीच्या म्हणण्यानुसार, भारत बिश्नोई टोळीचा वापर कॅनडामधील लोकांवर विशेषतः खलिस्तान या वेगळ्या शीख राष्ट्राची मागणी करणाऱ्यांवर हल्ले करण्यासाठी, खून करण्यासाठी आणि खंडणी वसूल करण्यासाठी करत होता. तथापि, भारत सरकारने या सर्व आरोपांचा स्पष्टपणे इन्कार केला आहे आणि सांगितले आहे की ओटावा सरकारसोबत मिळून ही टोळी रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे.द कॅनेडियन प्रेसनुसार, सेंटर फॉर इंटरनॅशनल गव्हर्नन्स इनोव्हेशनचे वरिष्ठ फेलो वेस्ली वॉर्क यांनी पूर्वी म्हटले होते की, या टोळीला दहशतवादी यादीत टाकल्याने फारसा फरक पडणार नाही, कारण कॅनडाची मुख्य समस्या म्हणजे गुन्हेगारी गुप्त माहिती गोळा करण्याची मर्यादित क्षमता होय.

Comments
Add Comment

Barking Deer: तुम्ही पाहिलंत का कधी 'भुंकणारं हरीण'?; जाणून घ्या भुकणाऱ्या हरणाबद्दल

जर तुम्ही जंगलात किंवा डोंगराळ भागात असाल आणि अचानक तुम्हाला कुत्र्यासारखा भुंकण्याचा आवाज ऐकू आला तर

PM Modi Malaysia Visit : पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्यामुळे भारताच्या अ‍ॅक्ट ईस्ट धोरणाला मिळणार बळकटी

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा दोन

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी