मुंबई-काशिद रो-रो सेवा रखडली

वादळ, वारे, उसळणाऱ्या लाटांमुळे कामात अडथळा


नांदगाव मुरुड : मुंबई-काशिद रो-रो सेवेचे गेल्या पाच वर्षांपासून संथ गतीने सुरू असलेले काम अद्याप पूर्णत्वास न गेल्याने येथील स्थानिकांसह पर्यटकांतही नाराजीचा सूर उमटत आहे. केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेंतर्गत सन २०१८ साली मुंबई ते काशिद रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गेली ५ वर्षे ठेकेदारामार्फत हे काम संथ गतीने सुरू आहे. येथे बांधण्यात येणाऱ्या ब्रेक वॉटर बंधारा, रो-रो जेट्टी तसेच प्रवासी जेट्टीचे काम पावसाळी हंगामात निसर्ग, तोक्ते आदी वादळांमुळे जोरदार वारे व काशिद समुद्र किनारी उसळणाऱ्या लाटांचा जोर आदी कारणांमुळे रखडले. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन पाच वर्षांचा कालावधी लोटला तरी सदर प्रकल्पाचे काम अद्याप सुरूच आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे.


दरवर्षी पाच लाखांहून अधिक पर्यटक येथे भेट देऊन समुद्र सफरीचा आनंद लुटतात. या सर्व पर्यटकांना मुंबईहून मांडवा, रेवस लॉन्चने अलिबागला येवून पुढे रस्त्याने खासगी अथवा भाड्याच्या गाडीने येतात. या प्रवासात त्यांचा बहुतांशी वेळ वाया जातो. परिणामी त्यांना येथे समुद्रस्नानाचा व सहलीचा खरा आनंद लुटता येत नाही. रो-रो सेवेमुळे त्यांचा वेळ वाचेल व पर्यटकांमध्येही वाढ होणार असल्याने येथील छोटे-मोठे व्यावसायिक देखील सदर रो-रो सेवा लवकर सुरू करण्याची मागणी करीत आहेत. येथील प्रवासी जेट्टीचे काम राज्य शासनातर्फे करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे ४२ कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे कळते. जवळपास ११२ कोटींच्या या प्रकल्पावर आतापर्यंत शंभर कोटी खर्च करण्यात आले आहे. समुद्राच्या लाटांचा मारा थोपविण्यासाठी ब्रेक वॉटर बंधारा, रो-रो जेट्टी, प्रवासी जेट्टी, टर्मिनल, पार्किंग, रस्ता आदी कामे सुरू असली तरी ती संथगतीने सुरू आहेत ती डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून कळते. सदर सेवा लवकर सुरू झाली तर पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन त्याचा फायदा पर्यटकांसह स्थानिकांनाही होईल.



मुंबईहून काशिदला रस्त्याने येण्यासाठी जवळपास पाच ते सहा तास लागतात. रो-रो सेवेमुळे दोन-तीन तासांत काशिदला पोहोचता येईल त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.
- मिलिंद माजगावकर
Comments
Add Comment

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी