एका जाडजूड बॅगेने घेतला रेल्वे प्रवाशांचा जीव, मुंब्रा अपघात प्रकरणी हाती आली नवी माहिती


मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन रुळांमधील कुंपणावर पडले होते. या अपघाताची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीच्या हाती नवी माहिती आली आहे. सीएसएमटी-कर्जत लोकलच्या नवव्या किंवा दहाव्या डब्याच्या पायदानावर उभ्या असलेल्या प्रवाशाकडे ३० सेमी जाडीची बॅग होती. ही बॅग समोरून येणाऱ्या कसारा-सीएसएमटी लोकलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डब्याच्या पायदानावर उभ्या प्रवाशांना लागली. त्यामुळे प्रवासी एकमेकांवर आदळले आणि काही लोकलमध्ये; तर काही रुळांवर पडले. कसारा-सीएसएमटी लोकलच्या काचांवर आलेले ओरखडेही या बॅगमुळे झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.


कर्जत लोकलमधील प्रवासी पायदानावर उभा असताना बॅग सावरण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकारात त्याचा तोल गेला आणि तो समोरून येणाऱ्या कसारा-सीएसएमटी लोकलवर आदळला. त्यामुळे त्याच डब्यातील आणखी काही प्रवासी खाली पडले. ताशी १५० किमी वेगाने लोकल धावत असताना दोन्ही गाड्यांमध्ये फक्त साधारण ०.७५ मीटर अंतर होते. यामुळे हे लहान वाटणारे कारण मोठ्या अपघाला कारणीभूत ठरू शकते असे निरीक्षण समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. हाती आलेल्या या नव्या माहितीमुळे एक जाडजूड बॅग ही रेल्वे प्रवाशांच्या अपघाती मृत्यूचे कारण ठरल्याची शक्यता व्यक्त होत आहे.


मध्य रेल्वेने पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालानुसार जाडजूड बॅग अपघाताला कारणीभूत ठरली आहे. यामुळे पायदानावर प्रवास करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई, प्रलंबित ऐरोली-कळवा उन्नत रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करणे, नव्या मार्गिका उभारणे; ही कामं करण्याची शिफारस समितीकडून रेल्वे मंडळाला करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

दिल्लीत २० वर्षीय विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला !

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिच्याच

'धंगेकर- मोहोळ हा विषय आता संपला, महायुतीमध्ये मतभेद नकोत' : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आळंदीमध्ये वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा उभारल्या जातील आळंदी  : कार्तिकी एकादशी आणि त्यानिमित्त होणाऱ्या

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: PSI बदनेला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

सातारा : फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील एका तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,