Israel - Iran War : दुबईत अडकलेले २३ कोल्हापूरकर सुरक्षित मायदेशी परतले; यूएईकडून मिळालं ‘सॉरी गिफ्ट’

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी गेलेल्या कोल्हापुरातील हुपरीमधील २३ पर्यटक अडकले होते. मात्र, आता हा प्रवासी ग्रुप सुरक्षितपणे मायदेशी परतला आहे.



करवीर निवासिनी आई अंबाबाईची कृपा :


युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईसह आखाती देशांतील विमानसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. कोल्हापूरकरांनी “करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या आशीर्वादामुळेच आम्ही सुरक्षित परतलो. भारत सरकारने दुबईसह अडकलेल्या सर्वांना परत आणावे,” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.



यूएईकडून पर्यटकांना ‘सॉरी गिफ्ट’ :


यूएई प्रशासनाने परतीच्या मार्गावर अडकलेल्या पर्यटकांसाठी दिलगिरी व्यक्त करत ग्रुपमधील प्रत्येकाला २६ हजार रुपयांचे ‘सॉरी गिफ्ट’ दिले आहे. इराणने युद्धजन्य परिस्थितीमुळे आपली हवाई वाहतूक बंद केल्याचे जाहीर केले, ज्याचा परिणाम दुबई, अबुधाबी आणि शारजाह विमानतळांवर झाला.


कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले की, “आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळाली आहे आणि ते सुरक्षित आहेत.” दुबईत महिला, वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश असलेला हा २३ जणांचा पर्यटन ग्रुप अचानक आलेल्या सुरक्षा अलर्ट आणि स्फोटांच्या बातम्यांमुळे घाबरला होता.


परत आलेल्या नागरिकांनी आपल्या अनुभवाबद्दल सांगितले की, “आकाशात उठणाऱ्या धुराच्या लोटांमुळे जीवाची घालमेल वाढत होती. मात्र, प्रशासनाच्या मदतीमुळे सुरक्षित परतलो,” असे प्रतिक्रीया दिली.


यूएईच्या जनरल सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने अडकलेल्या २० हजार प्रवाशांसाठी हॉटेल, जेवण, पाणी आणि बुकिंगचा सर्व खर्च उचलला. दुबई प्रशासनाने परतणाऱ्या प्रत्येक कोल्हापूरकराला २६ हजार रुपये दिले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने विमान कंपन्यांना आखाती देशांच्या हवाई मार्गांपासून बचाव करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

Maharashtra Rain Alert : 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे 29 ते 31 जुलैदरम्यान

Laxmanrao Joshi : ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे निधन; 'व्रतस्थ संपादकाला मुकलो' – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :  नागपूर 'तरुण भारत'चे माजी मुख्य संपादक ल. त्र्यं. (लक्ष्मणराव) जोशी (Laxmanrao Joshi) यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री

Illegal Mining : अवैध गौण खनिज उत्खननासाठी दहापट दंड

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे समभाग भांडवल ५०० कोटींवर मुंबई : राज्यातील वाळू आणि

Satara Suicide : NEET परीक्षेतील अपयशाने खचली! कराडमधील १८ वर्षीय विद्यार्थिनीची विष प्राशन करून आत्महत्या

सातारा : गेल्या काही दिवसांपासून नीट पेपरफुटीमुळे देशभरात आंदोलने सुरु होती. नीट पेपरफुटीमुळे आणि परिक्षेतील

Nagpur Rain Alert Update : नागपुरात मुसळधार पावसाची जोरदार हजेरी : सखल भागात साचले पाणी, सोमलवार शाळेचे मैदान जलमय; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये (Nagpur Heavy Rain) हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.

Nagpur Manish Nagar Accident : नागपूरच्या मनीष नगरमध्ये हृदयद्रावक दुर्घटना : ३ वर्षांच्या चिमुकल्याचा कारखाली चिरडून मृत्यू; थरार CCTV मध्ये कैद

नागपूर : नागपूर शहरातील मनीष नगर परिसरातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या वडिलांच्या