कर्जबाजारीपणामुळे पत्नीची विहिरीत उडी, दुसऱ्या दिवशी पतीनेही घेतला गळफास !

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील आळंद गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.


शुक्रवारी (२६ सप्टेंबर) रमाबाई जमधडे यांनी शेतातील विहिरीत उडी घेत जीवन संपवलं. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पतीने, विलास रामभाऊ जमधडे (वय ४३), पत्नीच्या अंत्यसंस्कारानंतर विहिरीजवळ कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्वी व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज करून आपल्या टोकाच्या निर्णयाची माहिती दिली होती.


संदेशात त्यांनी लिहिले होते की, "माझ्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पीक कर्ज आहे. काल माझ्या पत्नीने कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केली आणि मीही त्याच कारणामुळे आत्महत्या करत आहे. माझी शेवटची इच्छा अशी आहे की माझी मुलं आळंद गावातूनच आपलं शिक्षण पूर्ण करावं. सुमित, अमित मला माफ करा."


मिळालेल्या माहितीनुसार, जमधडे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या नावावर केवळ ४३ गुंठे जमीन असून शेतीतून पुरेसं उत्पन्न न मिळाल्याने ते पत्नीसमवेत मजुरी करून संसार चालवत होते. मात्र त्यांच्यावर बँक, सोसायटी आणि खासगी सावकारांचे मोठे कर्ज होते. पत्नी रमाबाई यांच्यावरदेखील बचत गटाचे कर्ज असल्याचे उघड झाले आहे.


गावकऱ्यांनी सांगितले की, विलास यांनी आत्महत्येपूर्वी शेतात जाऊन संदेश पाठवला. मात्र शेत गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असल्याने ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांनी गळफास घेतला होता. वडोद बाजार पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून पोस्टमार्टमसाठी फुलंब्री उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.


या दुहेरी आत्महत्येमुळे आळंद परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी आणि दोन अविवाहित मुलं असा परिवार आहे.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "