मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढला, रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली

मेगाब्लॉकमुळे रेल्वे सेवा कोलमडली


मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने मुंबईत पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज मुंबईसाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून, याचा परिणाम लोकल आणि रस्ते वाहतुकीवर स्पष्टपणे दिसून येत आहे.


पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आता पावसाचा जोर अधिकच वाढलेला दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रात्रभरात ६९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळपासून गोरेगाव, मालाड, अंधेरी, सांताक्रूझ, कांदिवली, दादर यांसारख्या भागांत जोरदार पाऊस पडत आहे.


?si=cjEePmIzVm_QPYZk

वाहतुकीचा फज्जा आणि पूरस्थितीची भीती


मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे, तर रस्त्यावरील वाहतुकीचाही फज्जा उडाला आहे. काही सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. आज रविवार असल्याने रस्त्यावर तुलनेने कमी वाहने असली तरी, अशीच संततधार कायम राहिल्यास अंधेरी सबवेसह मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



मेगाब्लॉकमुळे लोकल सेवा विस्कळीत


एकिकडे पावसाची संततधार सुरू असताना, दुसरीकडे मध्य रेल्वेने मुंबई विभागात आज मेगाब्लॉक घेतला आहे, ज्यामुळे लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. मध्य रेल्वेवर दुपारी ११ वाजता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर असणार आहे.


ट्रान्सहार्बर आणि पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमूळे आधीच लोकल उशिराने धावत आहेत आणि त्यातच मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे लोकल प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.


?si=KpF3Np2IFm9IzRqC

मुंबईसह सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट


हवामान विभागाने केवळ मुंबईच नव्हे, तर ठाणे, नाशिक आणि पुणे यांसह एकूण सहा जिल्ह्यांना आज 'रेड अलर्ट' जारी केला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.


सततच्या आणि जोरदार पावसामुळे मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांत निर्माण झालेली ही परिस्थिती गंभीर आहे. एकाच वेळी लोकलवरील मेगाब्लॉक आणि अतिवृष्टीचा इशारा यामुळे नागरिकांची सुरक्षितता आणि सोयी-सुविधा यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सज्ज आहे.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या