मराठवाड्यातील मदतकार्यावर मुख्यमंत्र्यांचा आढावा; अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर राहण्याचे निर्देश

मुंबई : मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने पुन्हा धुमाकू निर्देशळ घातला आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून, अनेक शेतशिवार आणि गावे जलमय झाली आहेत. गोदावरीसह कयाधू, मांजरा या नद्यांना मोठा पूर आला असून, घरांमध्ये व सार्वजनिक इमारतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. या पावसाळ्यात मराठवाड्यात तब्बल २८५७ गावे बाधित झाली असून, जूनपासून आजवर ९० जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची मदत घ्यावी लागली आहे. परंडा तालुक्यातील पूरस्थितीने पुन्हा कहर केला, तर नांदेड आणि बीड शहरात पाणी शिरल्याने शाळा, अगदी पोलीस ठाण्यांपर्यंत पाणी पोहोचले. यामुळे लातूर व नांदेड जिल्ह्यांतील शाळा व शिकवणी वर्गांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.


या गंभीर घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून मदतकार्याची माहिती घेतली. मदत शिबिरांमध्ये नागरिकांसाठी भोजन, पाणी व आरोग्याच्या सोयी व्यवस्थित उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आदेश दिले. काही जिल्ह्यांत चाऱ्याची टंचाई असल्याने तातडीने पुरवठा करण्यासही सांगितले. पावसामुळे धरणांमधून विसर्ग वाढत असल्याने नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे आणि सर्व अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर राहून कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.





मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलसंपदा विभागाकडून धरणांची परिस्थिती व विसर्गाचे तपशील जाणून घेतले. जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात १५० मिलिमीटर पावसामुळे तब्बल १,२५,००० क्युसेक पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले असून, हा विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत वाढू शकतो. माजलगाव धरणातून ४१,७०१ क्युसेक विसर्ग सुरू आहे, जो यापूर्वी ९५,००० क्युसेक होता. धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर आणि बीड भागातील मुसळधार पावसामुळे सीना कोळेगाव येथून ७५,००० क्युसेक पाणी सोडले जात आहे, तर उजनी धरणातून १ लाख क्युसेक विसर्ग सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.


दरम्यान, बंगालच्या उपसागरातून सरकलेले कमी दाबाचे क्षेत्र सौराष्ट्राकडे जात असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून येतो आहे. यामुळे रविवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. रायगड आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


राज्यातील वाढती पूरस्थिती पाहता प्रशासन हायअलर्टवर असून, नागरिकांनीही सतर्क राहून सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "