मराठवाड्यातील मदतकार्यावर मुख्यमंत्र्यांचा आढावा; अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर राहण्याचे निर्देश

मुंबई : मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने पुन्हा धुमाकू निर्देशळ घातला आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून, अनेक शेतशिवार आणि गावे जलमय झाली आहेत. गोदावरीसह कयाधू, मांजरा या नद्यांना मोठा पूर आला असून, घरांमध्ये व सार्वजनिक इमारतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. या पावसाळ्यात मराठवाड्यात तब्बल २८५७ गावे बाधित झाली असून, जूनपासून आजवर ९० जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची मदत घ्यावी लागली आहे. परंडा तालुक्यातील पूरस्थितीने पुन्हा कहर केला, तर नांदेड आणि बीड शहरात पाणी शिरल्याने शाळा, अगदी पोलीस ठाण्यांपर्यंत पाणी पोहोचले. यामुळे लातूर व नांदेड जिल्ह्यांतील शाळा व शिकवणी वर्गांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.


या गंभीर घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून मदतकार्याची माहिती घेतली. मदत शिबिरांमध्ये नागरिकांसाठी भोजन, पाणी व आरोग्याच्या सोयी व्यवस्थित उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आदेश दिले. काही जिल्ह्यांत चाऱ्याची टंचाई असल्याने तातडीने पुरवठा करण्यासही सांगितले. पावसामुळे धरणांमधून विसर्ग वाढत असल्याने नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे आणि सर्व अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर राहून कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.





मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलसंपदा विभागाकडून धरणांची परिस्थिती व विसर्गाचे तपशील जाणून घेतले. जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात १५० मिलिमीटर पावसामुळे तब्बल १,२५,००० क्युसेक पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले असून, हा विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत वाढू शकतो. माजलगाव धरणातून ४१,७०१ क्युसेक विसर्ग सुरू आहे, जो यापूर्वी ९५,००० क्युसेक होता. धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर आणि बीड भागातील मुसळधार पावसामुळे सीना कोळेगाव येथून ७५,००० क्युसेक पाणी सोडले जात आहे, तर उजनी धरणातून १ लाख क्युसेक विसर्ग सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.


दरम्यान, बंगालच्या उपसागरातून सरकलेले कमी दाबाचे क्षेत्र सौराष्ट्राकडे जात असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून येतो आहे. यामुळे रविवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. रायगड आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


राज्यातील वाढती पूरस्थिती पाहता प्रशासन हायअलर्टवर असून, नागरिकांनीही सतर्क राहून सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे