डोंबिवलीत प्रियकराने केली आत्महत्या, पण नेमकं कारण काय? खरंच प्रेयसीसोबत वाद झाला होता का?

प्रेमसंबंधातील वाद की काहीतरी वेगळं?


डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ माजली. प्रेयसीसोबत झालेल्या वादानंतर एका २२ वर्षीय तरुणाने अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. मृत तरुणाचे नाव ऋषिकेश परब असून तो महाविद्यालयीन विद्यार्थी होता. महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीशी त्याची ओळख झाली होती आणि ती हळूहळू प्रेमसंबंधात बदलली. काही महिन्यांपर्यंत हे नातं सुरळीत चाललं, पण अलीकडे त्यांच्यात वादविवाद सुरू झाले होते.


सुदामा इमारतीत सहाव्या मजल्यावर ऋषिकेश आपल्या कुटुंबासोबत राहत होता. शनिवारी सकाळी झालेल्या वादानंतर ऋषिकेशने संतापाच्या भरात मोबाईल घरात फेकून दिला आणि थेट इमारतीच्या अकराव्या मजल्यावर गेला. तिथे डक्ट भागात उभं राहून तो उडी मारण्याच्या तयारीत असल्याचं पाहून इमारतीतील रहिवाशांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. लगेचच विष्णुनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन दलाचे जवानही मदतीला आले.


पोलीस आणि नागरिकांनी खूप प्रयत्न करूनही ऋषिकेश ऐकायला तयार झाला नाही. अचानक त्याने सज्ज्यावरून खाली झेप घेतली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.


या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी व्यक्त केला आहे. पण नेमकं कारण काय? नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. खरंच प्रेयसीसोबतचा वाद या टोकाच्या निर्णयामागे होता का, की इतर काही कारणं होती, याचा तपास पोलीस करत आहेत. विष्णुनगर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


दरम्यान, तरुण आयुष्याचं असं अकाली संपवणं ही समाजासाठी चिंतेची बाब ठरत आहे. नात्यातील मतभेद, मानसिक तणाव आणि भावनिक दबावाचा परिणाम किती भयंकर असू शकतो, हे या घटनेतून स्पष्ट झालं आहे.

Comments
Add Comment

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना