मुंबईत दोन लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांना अटक

मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) मुंबई युनिटने वडाळा टीटी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे (वय ५२) आणि पोलिस उपनिरीक्षक राहुल वाघमोडे (वय ३७) यांचा समावेश आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि एका व्यक्तीचा कम्युनिटी हॉलशी संबंधित वाद काही दिवसांपूर्वी झाला होता. हा वाद ७ सप्टेंबर रोजी अधिक तीव्र झाला आणि दोन्ही गटांनी वडाळा टीटी पोलिस ठाण्यात धाव घेतली.


फिर्यादीने आरोप केला की, वादात दुसऱ्या गटाविरुद्ध कारवाई करण्यासाठी पीएसआय राहुल वाघमोडे यांनी त्यांच्याकडून ५०,००० रुपयांची लाच मागितली, तर वरिष्ठ निरीक्षक सरोदे यांनी ५ लाख रुपयांची मागणी केली. नंतर बोलणी करून सरोदे यांनी ही रक्कम ४ लाखांवर आणली. अखेर १० सप्टेंबर रोजी वाघमोडे यांनी फिर्यादीकडून २०,००० रुपये घेतले. यानंतर तक्रारदाराने थेट ACB कडे धाव घेतली आणि अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली.


शुक्रवारी (२७ सप्टेंबर) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि उर्वरित रक्कम स्वीकारताना दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांना अटक केली. वाघमोडे यांनी उर्वरित ३०,००० रुपये घेतले आणि त्यातील २ लाख रुपये सरोदे यांना दिले. एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडले. दोन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार असून, ACB त्यांची कोठडी मागणार आहे.

Comments
Add Comment

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात