शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावला लालबागचा राजा


मुंबई : महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी नवरात्रौत्सवाचा उत्साह आहे, त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग तसेच मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे वाताहात झाली आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सरसावले आहे. लालबागच्या राजा मंडळाने अतिवृष्टीबाधित नागरिकांसाठी पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान मोजता येणं शक्य नाही. पण प्रत्येकाकडून फूल नाही तर फुलाची पाकळी मदत व्हावी, अशी भावना व्यक्त करत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठीचा धनादेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याने सुपूर्द केला. हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा होणार आहे. या निधीतून पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे.


महायुतीच्या सर्व आमदार आणि खासदारांनी त्यांचा एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीतून राज्यातील पुराचा फटका बसलेल्यांना मदत केली जाणार आहे. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानेदेखील सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पावसाचा आणि पुराचा फटका बसलेल्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील अनेक सामाजिक संघटनांनी तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही पावसाचा आणि पुराचा फटका बसलेल्यांना मदत करण्यासाठी आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.


कालपर्यंत ज्या नद्यांचे पाणी शेती फुलवत होते त्याच नद्या पुरामुळे फुगल्या आहेत. शेतीचे अतोनात नुकसान करत आहे. ठिकठिकाणी जमीन खरडून निघाली आहे. उभी पिकं पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेली आहेत. काही उरलंच असेल तर सडून गेल्यामुळे न वापरण्याच्या स्थितीत पोहोचले आहे. हजारो नागरिकांना नेसत्या वस्त्रांनिशी राहते घर सोडून सरकारी शिबिरात आश्रय घ्यावा लागला आहे. या संकटातून सावरण्यासाठी सरकार, प्रशासन मदतकरत आहे. अनेक सामाजिक संस्था, संघटना, स्वयंसेवक मदतीसाठी पुढे येत आहेत. अनेकांनी वैयक्तिकरित्या पण मदत केली आहे. या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मदत जाहीर केली आहे.


Comments
Add Comment

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील

BKC च्या ट्रॅफिकला ब्रेक! मेट्रो 2B चा महत्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई : वांद्रे–कुर्ला संकुल आणि आसपासच्या भागातील वाहतूक ताण कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.