शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावला लालबागचा राजा


मुंबई : महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी नवरात्रौत्सवाचा उत्साह आहे, त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग तसेच मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे वाताहात झाली आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सरसावले आहे. लालबागच्या राजा मंडळाने अतिवृष्टीबाधित नागरिकांसाठी पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान मोजता येणं शक्य नाही. पण प्रत्येकाकडून फूल नाही तर फुलाची पाकळी मदत व्हावी, अशी भावना व्यक्त करत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठीचा धनादेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याने सुपूर्द केला. हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा होणार आहे. या निधीतून पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे.


महायुतीच्या सर्व आमदार आणि खासदारांनी त्यांचा एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीतून राज्यातील पुराचा फटका बसलेल्यांना मदत केली जाणार आहे. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानेदेखील सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पावसाचा आणि पुराचा फटका बसलेल्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील अनेक सामाजिक संघटनांनी तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही पावसाचा आणि पुराचा फटका बसलेल्यांना मदत करण्यासाठी आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.


कालपर्यंत ज्या नद्यांचे पाणी शेती फुलवत होते त्याच नद्या पुरामुळे फुगल्या आहेत. शेतीचे अतोनात नुकसान करत आहे. ठिकठिकाणी जमीन खरडून निघाली आहे. उभी पिकं पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेली आहेत. काही उरलंच असेल तर सडून गेल्यामुळे न वापरण्याच्या स्थितीत पोहोचले आहे. हजारो नागरिकांना नेसत्या वस्त्रांनिशी राहते घर सोडून सरकारी शिबिरात आश्रय घ्यावा लागला आहे. या संकटातून सावरण्यासाठी सरकार, प्रशासन मदतकरत आहे. अनेक सामाजिक संस्था, संघटना, स्वयंसेवक मदतीसाठी पुढे येत आहेत. अनेकांनी वैयक्तिकरित्या पण मदत केली आहे. या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मदत जाहीर केली आहे.


Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य