शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावला लालबागचा राजा


मुंबई : महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी नवरात्रौत्सवाचा उत्साह आहे, त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग तसेच मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे वाताहात झाली आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सरसावले आहे. लालबागच्या राजा मंडळाने अतिवृष्टीबाधित नागरिकांसाठी पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान मोजता येणं शक्य नाही. पण प्रत्येकाकडून फूल नाही तर फुलाची पाकळी मदत व्हावी, अशी भावना व्यक्त करत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठीचा धनादेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याने सुपूर्द केला. हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा होणार आहे. या निधीतून पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे.


महायुतीच्या सर्व आमदार आणि खासदारांनी त्यांचा एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीतून राज्यातील पुराचा फटका बसलेल्यांना मदत केली जाणार आहे. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानेदेखील सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पावसाचा आणि पुराचा फटका बसलेल्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील अनेक सामाजिक संघटनांनी तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही पावसाचा आणि पुराचा फटका बसलेल्यांना मदत करण्यासाठी आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.


कालपर्यंत ज्या नद्यांचे पाणी शेती फुलवत होते त्याच नद्या पुरामुळे फुगल्या आहेत. शेतीचे अतोनात नुकसान करत आहे. ठिकठिकाणी जमीन खरडून निघाली आहे. उभी पिकं पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेली आहेत. काही उरलंच असेल तर सडून गेल्यामुळे न वापरण्याच्या स्थितीत पोहोचले आहे. हजारो नागरिकांना नेसत्या वस्त्रांनिशी राहते घर सोडून सरकारी शिबिरात आश्रय घ्यावा लागला आहे. या संकटातून सावरण्यासाठी सरकार, प्रशासन मदतकरत आहे. अनेक सामाजिक संस्था, संघटना, स्वयंसेवक मदतीसाठी पुढे येत आहेत. अनेकांनी वैयक्तिकरित्या पण मदत केली आहे. या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मदत जाहीर केली आहे.


Comments
Add Comment

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३३ लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३ हजार कोटींची मदत

मुंबई : यंदा सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र्रात पावसाने थैमान घातले. शेतीपासून लोकांची घरंदारं सगळंच पावसात

सायन, कुर्ला बीकेसीतील प्रवाशांना मिळणार नवा पूल, वाहतूक कोंडी होणार दूर

मुंबई : मिठी नदीवर नवा पूल बांधण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेने

महापालिका आयुक्तांनी, अमित साटम यांच्या पत्राची दखल घेतली नाही आणि आता घडले असे...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेतील अभियंत्याच्या बदलीत मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असल्याने याबाबत

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या आतषबाजींकरता मुंबईतील काही प्रमुख दुकानांमध्ये

मालाड पूर्वेत भीषण आग! लाकडी गोदामात लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप: नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या मालाड पूर्व भागात आज दुपारी भीषण आगीची घटना घडली.