नितीन गडकरींवर अंजली दमानियांचे गंभीर आरोप


मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. टोलच्या माध्यमातून भ्रष्टाचार सुरू आहे आणि गडकरींनी हा टोल जनतेवर लादला आहे, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. टोलमधून मिळालेला पैसा 'आयडीएल' नावाच्या कंपनीत गेला आणि तिथून तो नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला, असा थेट आरोप दमानिया यांनी केला आहे. दमानियांच्या या आरोपांना नितीन गडकरी यांनी अद्याप थेट उत्तर दिलेले नाही.



इथेनॉल संदर्भात दमानिया यांनी गडकरींच्या कंपन्यांच्या जाळ्यावर बोट ठेवले आहे. इथेनॉल आणि रस्ते क्षेत्रात गडकरींशी संबंधित असंख्य कंपन्या आहेत. प्रत्येक रस्त्याशी संबंधित कामात येनकेन प्रकारेण गडकरींशी संबंधित कंपन्या गुंतल्या आहेत. गडकरींनी किमान १२८ कंपन्या स्थापन करुन ठेवल्या आहेत. याच कंपन्यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या कामांच्या निमित्ताने पैशांची उलाढाल सुरू आहे. या संदर्भातले आर्थिक व्यवहार हाती आले आहेत. योग्य वेळी ते उघड करेन. हे व्यवहार उघड झाल्यानंतर त्यांची पडताळणी करायला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो, असेही अंजली दमानिया म्हणाल्या.


नितीन गडकरी केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी देशाची सेवा करण्यासाठी शपथ घेऊन मंत्रि‍पदाचा स्वीकार केला आहे. स्वतःच्या मुलांच्या कंपन्या उघडण्यासाठी किंवा त्यांना नफा व्हावा म्हणून गडकरींना मंत्रि‍पदाची जबाबदारी सोपवलेली नाही. पण गडकरींनी पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर केला आहे. मंत्रि‍पदाचा वापर गडकरींनी मुलांच्या कंपन्यांना मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठीच केला; असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.


नितीन गडकरी म्हणतात की त्यांना पैशांची गरज नाही. कारण त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत. ते म्हणतात की त्यांच्या मेंदूचं मूल्य दर महिन्याला २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. खरंतर त्यांनी स्वतःला खूप कमी लेखलं आहे. कारण गडकरींचे पुत्र दररोज १४४ कोटी रुपयांनी श्रीमंत होत आहेत; असाही आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. 


Comments
Add Comment

Bihar Vidhan Sabha Election Result : बिहार विधानसभा मतमोजणीला लवकरच सुरुवात; नवे सरकार आज स्थापन होण्याच्या दिशेने पहिले पाऊल...

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले असून, आज, निकालाचा 'महादिवस' आहे. आज या निवडणुकीचे

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

महिलांच्या वाढलेल्या विक्रमी मतदानामुळे एनडीएचे पारडे जड?

निवडणुकीची आज मतमोजणी व निकाल मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती. ही

मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह जवानांना पूरपरिस्थितीत बचावाचे प्रशिक्षण, ऍडवॉन्स फ्लड आणि रेस्क्यू प्रशिक्षणाकरता नेमली संस्था

पाण्यात आणि उंचावर अडकलेल्यांना अत्याधुनिक पध्दतीने वाचवण्यासाठी करणार प्रशिक्षित मुंबई (खास प्रतिनिधी):

पवई तलावातील जलपर्णी वाढता वाढता वाढे, कंत्राटदाराला मिळाला १ कोटी रुपयांचा बोनस

मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील पवई तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावरील जलपर्णी वनस्पती, तरंगणा-या तसेच जमिनीतून

मुंबईतील २७ टक्केच नागरिक साखरेपासून राहतात लांब, व्यायामचा अभाव आणि चुकीचा आहारामुळे असंसर्गजन्य आजारांना दिले जाते निमंत्रण

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये जानेवारी २०२५ पासून 'मीठ - साखर अभियान