Navratri 2025 : नवरात्रीत कांदा आणि लसूण खाणं पाप? यावर प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबरपासून भव्य सुरुवात झाली आहे. देशभरातील श्रद्धालूंनी या नऊ दिवसांच्या महापर्वाला मोठ्या भक्तिभावाने सुरुवात केली आहे. यंदाचे नवरात्र विशेष म्हणजे ते दहा दिवसांचे आहेत. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला या उत्सवाची सुरूवात झाली, तर दशमी तिथीला उपवास सोडल्यावर हा महापर्व संपेल. नवरात्रात भक्त उपवास ठेवतात, मांसाहार आणि मद्यपान टाळतात. काहीजण पूर्णपणे अनवानी आहार घेतात, तर काहीजण लसूण आणि कांदा देखील टाळतात. त्यांचा विश्वास आहे की देवीच्या आराधनेत कांदा-लसूण सेवन करणे योग्य नाही. या पवित्र काळात भक्त देवीच्या विविध रूपांची पूजा करतात, आरतीत सहभागी होतात आणि भजन-कीर्तनाद्वारे भक्तिभाव व्यक्त करतात. पण खरोखरंच नवरात्रीत लसूण आणि कांदे खाणे पाप असते का? तसेच ते खाल्ल्यानंतर देवीची सेवा करू शकत नाही का? असे प्रश्न अनेकांना पडतात. अनेकांना याबाबत संभ्रम असतात. याबद्दल प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं आहे ते जाणून घेऊयात.



लसूण-कांदा खाल्ल्यास पूजा होईल का? प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं?


श्रावण, नवरात्र आणि इतर पवित्र सणांच्या काळात लसूण आणि कांदा खाणे योग्य आहे का, हा प्रश्न एका भक्ताने संत प्रेमानंद महाराजांशी विचारला. महाराजांनी स्पष्ट केले की, “संत आणि ऋषींना लसूण व कांदा खाण्यास मनाई असते. कारण त्यांचा सेवन केल्यास तमोगुण वाढतो, ज्यामुळे जप, तप आणि ध्यान यामध्ये अडथळे निर्माण होतात. लसूण आणि कांदा खाणे पाप नाही, कारण हे बटाट्यांसारख्या इतर भाज्यांसारखेच पिकवले जातात. परंतु त्यांच्या विशेष गुणधर्मामुळे साधकांसाठी, जप-तप करणाऱ्यांसाठी आणि दीक्षा घेतलेल्या व्यक्तींसाठी ते निषिद्ध मानले जातात.” महाराजांचे मार्गदर्शन भक्तांसाठी उपयुक्त आहे, जे आपल्या धार्मिक आणि साधनात्मक आचरणात संतुलन ठेवू इच्छितात. प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले की, “जर कोणी लसूण आणि कांदा खाल्ला असेल तरी तो देवी दुर्गाची सेवा करू शकतो, परंतु देवीला अर्पण केलेल्या नैवेद्यात लसूण आणि कांदा वापरलेला नसावा.”



आधी ‘राधा-राधा’ जप करा आणि मग कांदा खा


भक्तांनी विचारले की, “जेव्हा शाळेतील मुले भेटीसाठी बाहेर जातात, तेव्हा त्यांना कांदा-लसूणाचं जेवण मिळतं. आम्हालाही तिथे जाण्याची इच्छा असते, पण बाहेरून जेवण मिळत नाही. अशा परिस्थितीत काय करावे?” यावर प्रेमानंद महाराजांनी उत्तर दिले, “उपाशी राहू नका. आधी ‘राधा-राधा’ जप करा आणि मग कांदा खा. कांदा देखील थोडे प्रेम निर्माण करतो. संतांनी कांदा निषिद्ध केले कारण त्याचे सेवन तमोगुण वाढवते, आणि भजन करताना सत्वगुण आवश्यक असतात. त्यामुळे कांदा खाणे पापकर्म नाही.” महाराजांनी उदाहरण देत पुढे सांगितले की, “सैन्यात, व्यवसायात किंवा अभ्यासात असलेल्यांना सूट आहे. साधू, महात्मा आणि ईश्वराच्या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना कांदा आणि लसूण खाण्यास मनाई आहे. जरी हे दारू, मासे किंवा मांसासारखे पाप मानले जात नसले तरी, ते मूळतः तामसिक आहेत आणि भक्ती पद्धतींच्या विरुद्ध भावना निर्माण करतात. म्हणून, ते निषिद्ध मानले जातात” असंही महाराजांनी म्हटलं आहे.



कांदा-लसूणवरून भांडण टाळा


प्रेमानंद महाराजांनी भक्तांना मार्गदर्शन केले की, “ज्यांची इच्छा असेल त्यांनी कांदा-लसूण खावे. कौटुंबिक जीवनात अनेकदा कुटुंबातील सदस्य कांदा आणि लसूण खातात, त्यामुळे भक्तीच्या नावाखाली भांडणे करणे योग्य नाही. भांडायची गरज असेल तर स्वयंपाकघरात सर्वांसाठी एकसारखे पदार्थ बनवण्याची विनंती करा. तसेच, कोणाला देवाला नैवेद्य दाखवताना कांदा-लसूण नको वाटत असेल, तर त्यांच्यासाठी वेगळे जेवण बनवू शकता.”



दीक्षा घेतल्यावर कांदा-लसूण खाण्यावर नियम कडक


अशातच दीक्षा घेतल्यानंतर काय नियम पाळावे लागतात याबद्दलही प्रेमानंद महाराजांनी म्हटलंय की, “दीक्षा घेतल्यानंतर कांदा आणि लसूण खाण्यावर अधिक कडक नियम लागू होतो. या काळात भक्तांनी हरीची भक्ती करण्याची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी कांदा-लसूण खाणे टाळावे. मात्र, ज्यांना मुले आहेत किंवा ज्यांची नोकरीसाठी आवश्यक असते, त्यांच्यासाठी परिस्थितीनुसार विवेकपूर्ण खाणे पाप मानले जात नाही. दीक्षा घेतलेल्या भक्तांनी राधा-राधेचा जप करत नियम पाळावे.”

Comments
Add Comment

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण ठरणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या करारांतर्गत ९ जिल्ह्यांतील ५ हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Eknath Shinde: कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही; जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!

लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी’–‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट

जागतिक मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तत्पर - कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा

महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे मंत्री लोढा यांच्या हस्ते उदघाटन मुंबई : जगातील अत्यावश्यक मनुष्यबळाची

Nilesh Rane and Sanjay Raut : एवढा नीचपणा बरा नव्हे...घरातला कर्ता माणूस गेलाय ओ, निलेश राणेंनी बारामतीतून राऊतांचे काढले वाभाडे

बारामती : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातावरून राज्यात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अजित पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकत्व

मुंबई : बारामती येथे विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची धुरा त्यांच्या पत्नी

Sunetra Pawar : अजितदादांचा वारसा आता सुनेत्रा वहिनींच्या हाती! पुण्याच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवारचं; परिपत्रक जारी

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा