आली दिवाळी! रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा!

नवी दिल्ली : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, रेल्वेच्या गट ‘क’ (ग्रुप-सी) आणि गट ‘ड’ (ग्रुप-डी) स्तरावरील कर्मचाऱ्यांना यावर्षी ७८ दिवसांचा बोनस दिला जाईल. या निर्णयामुळे देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या निर्णयाचा सुमारे ११.५ लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. बोनसची रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल आणि त्याचे वितरण लवकरच सुरू होणार आहे.


बोनस देण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ (टेक्निशियन), टेक्निशियन हेल्पर, पॉईंट्समन, मिनिस्ट्रियल स्टाफ अन्य गट ‘क’ चे कर्मचारी रेल्वेतील नॉन-गझेटेड कर्मचाऱ्यांना दरवर्षी बोनस देण्यात येतो, ज्याला उत्पादकता आधारित बोनस असे म्हणतात.


हा बोनस त्यांच्या कामगिरीशी संबंधित असतो आणि प्रत्येक वर्षी सणांच्या आधी दिला जातो. हा निर्णय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कष्टांची दखल घेतल्याचे प्रतिक मानले जात असून सणासुदीच्या काळात त्यांच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लावणारा ठरणार आहे.

Comments
Add Comment

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न