इंडिगो पाठोपाठ एअर इंडियाची विमानेही नवी मुंबई विमानतळावरुन भरारी घेणार

उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात


मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन लवकरच होणार असून, त्यापूर्वीच विमान कंपन्यांनी येथे सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. इंडिगो एअरलाईन्सपाठोपाठ आता एअर इंडियानेही या विमानतळावरून मोठी भरारी घेण्याची घोषणा केली आहे.


मंगळवारी एअर इंडियाने जाहीर केले की, कंपनी २०२६ च्या मध्यापर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज ५५ विमानांचे उड्डाण करेल. २०२६ च्या हिवाळ्यापर्यंत ही संख्या वाढवून दररोज ६० विमाने उड्डाण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. यात आंतरराष्ट्रीय उड्डाणांचाही समावेश असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या ३० सप्टेंबर रोजी होण्याची दाट शक्यता आहे. सिडको युद्धपातळीवर विमानतळाची कामे पूर्ण करत आहे. उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच एअर इंडियाने ही माहिती दिली आहे.


या विमानतळावरून उड्डाण सुरू करणारी पहिली विमान कंपनी इंडिगो एअरलाईन्स ठरली आहे. इंडिगोने सुरुवातीपासूनच दररोज १५ हून अधिक शहरांसाठी १८ उड्डाणे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विमानतळ सुरू झाल्यावर दररोज एकूण ७९ उड्डाणे होणार आहेत. यापैकी १४ उड्डाणे आंतरराष्ट्रीय असतील. यापूर्वी, २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले चाचणी उड्डाण यशस्वीपणे पूर्ण केले होते.



जागतिक केंद्र बनण्याचे उद्दिष्ट


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्हीसाठी एक प्रमुख जागतिक वाहतूक केंद्र म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जचे सीईओ अरुण बन्सल यांनी या विमानतळाला यशस्वी आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे बनवण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे. एअर इंडियाच्या या विस्तारामुळे जागतिक विमान वाहतुकीच्या क्षेत्रात भारताचे स्थान अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे. हे विमानतळ आपल्या धोरणात्मक स्थानामुळे भारताला उर्वरित जगाशी जोडण्याचे एक महत्त्वाचे केंद्र ठरेल.

Comments
Add Comment

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Devendra Fadnavis BMC Election 2026 : उद्धव आणि राज ठाकरेंचा जीव फक्त मुंबईतच का अडकलाय? फडणवीसांनी पुराव्यासह काढला भ्रष्टाचाराचा पाढा, नक्की काय म्हणाले?"

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये