मंत्री नितेश राणेंनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट : कोकणवासीयांच्या अनेक मागण्या मांडल्या सविस्तर

वैभववाडी - कोल्हापूर या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची ही केली मागणी


रेल्वेमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद;सहकार्य व तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन


दिल्ली : माननीय मंत्री नितेशजी राणे यांनी आज दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकणातील रेल्वे समस्यांबाबत चर्चा करून काही मागण्या मांडल्या.रेल्वेमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक सहकार्य व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.


मत्स्यव्यवसाय मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वेमंत्र्यांशी कोकण विभागातील महत्त्वाच्या रेल्वे प्रश्नांवर चर्चा करताना उदभवनाऱ्या समस्या मांडल्या.सिंधुदुर्ग व परिसरातील महत्वाच्या स्थानकांवर १६ एक्सप्रेस गाड्यांचे थांबे,कोइंबतूर, नागरकोईल व मडगाव एक्सप्रेसना कणकवली येथे थांबा,मांडवी एक्स्प्रेसला नांदगाव स्थानकावर थांबा मिळावा, मडूरे व सावंतवाडी येथून विशेष गाड्या,पीआरएस काऊंटर,प्रवासी सुविधा उन्नतीकरण,तुतारी एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ,स्थानकाचे आधुनिकीकरण तसेच वैभववाडी - कोल्हापूर या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी यासारख्या अनेक मागण्या रेल्वेमंत्र्यांकडे केल्या.


रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्री नितेश राणे यांच्या या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन आवश्यक ते सहकार्य व यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.मंत्री नितेश राणेंनी घेतलेल्या या भेटीमुळे कोकणवासीयांच्या गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या मागण्या आता लवकरच पूर्ण होताना दिसणार आहेत.

Comments
Add Comment

AAP Sarpanch Shot in Amritsar : अमृतसरमध्ये थरार! लग्नमंडपात घुसून 'आप' नेत्याची डोक्यात गोळी झाडून हत्या; अवघ्या १३ सेकंदात आरोपी पसार

चंदीगड : पंजाबमध्ये गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना अमृतसरमध्ये घडली

आसाममध्ये भल्या पहाटे भूकंप! नागरिकांची उडाली धावपळ; वाचा सविस्तर

गुवाहाटी : आसाममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

PM modi on Somnath Temple : विध्वंस नव्हे, हा तर स्वाभिमानाचा विजय! सोमनाथच्या १००० वर्षांच्या अढळ विश्वासावर पंतप्रधान मोदींचा विशेष लेख

पाटण : गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले आणि कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सोमनाथ मंदिरावर

एक लाख 'ड्रोन वॉरियर्स'सह 'भैरव स्पेशल फोर्स' सज्ज

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; भारतीय लष्कराची झेप नवी दिल्ली : आधुनिक युद्धशास्त्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवत

कुटुंबातील घट्ट नाती ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना रोखू शकतात: मोहन भागवत

भोपाळ : एका कुटुंबात पालक आणि मुलांमधील संवाद आणि त्यांच्यातील घट्ट नाते लव्ह जिहादसारख्या घटना रोखू शकतात.

‘एक्स’वर महिलांचे आक्षेपार्ह फोटो, 'एआय'च्या गैरवापराबद्दल खासदारांचं मोदी सरकारला पत्र!

नवी दिल्ली : शिवसेना (उबाठा)च्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकतेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि