मंत्री नितेश राणेंनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट : कोकणवासीयांच्या अनेक मागण्या मांडल्या सविस्तर

वैभववाडी - कोल्हापूर या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची ही केली मागणी


रेल्वेमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद;सहकार्य व तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन


दिल्ली : माननीय मंत्री नितेशजी राणे यांनी आज दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकणातील रेल्वे समस्यांबाबत चर्चा करून काही मागण्या मांडल्या.रेल्वेमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक सहकार्य व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.


मत्स्यव्यवसाय मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वेमंत्र्यांशी कोकण विभागातील महत्त्वाच्या रेल्वे प्रश्नांवर चर्चा करताना उदभवनाऱ्या समस्या मांडल्या.सिंधुदुर्ग व परिसरातील महत्वाच्या स्थानकांवर १६ एक्सप्रेस गाड्यांचे थांबे,कोइंबतूर, नागरकोईल व मडगाव एक्सप्रेसना कणकवली येथे थांबा,मांडवी एक्स्प्रेसला नांदगाव स्थानकावर थांबा मिळावा, मडूरे व सावंतवाडी येथून विशेष गाड्या,पीआरएस काऊंटर,प्रवासी सुविधा उन्नतीकरण,तुतारी एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ,स्थानकाचे आधुनिकीकरण तसेच वैभववाडी - कोल्हापूर या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी यासारख्या अनेक मागण्या रेल्वेमंत्र्यांकडे केल्या.


रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्री नितेश राणे यांच्या या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन आवश्यक ते सहकार्य व यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.मंत्री नितेश राणेंनी घेतलेल्या या भेटीमुळे कोकणवासीयांच्या गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या मागण्या आता लवकरच पूर्ण होताना दिसणार आहेत.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने