मंत्री नितेश राणेंनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट : कोकणवासीयांच्या अनेक मागण्या मांडल्या सविस्तर

वैभववाडी - कोल्हापूर या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची ही केली मागणी


रेल्वेमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद;सहकार्य व तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन


दिल्ली : माननीय मंत्री नितेशजी राणे यांनी आज दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकणातील रेल्वे समस्यांबाबत चर्चा करून काही मागण्या मांडल्या.रेल्वेमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक सहकार्य व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.


मत्स्यव्यवसाय मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वेमंत्र्यांशी कोकण विभागातील महत्त्वाच्या रेल्वे प्रश्नांवर चर्चा करताना उदभवनाऱ्या समस्या मांडल्या.सिंधुदुर्ग व परिसरातील महत्वाच्या स्थानकांवर १६ एक्सप्रेस गाड्यांचे थांबे,कोइंबतूर, नागरकोईल व मडगाव एक्सप्रेसना कणकवली येथे थांबा,मांडवी एक्स्प्रेसला नांदगाव स्थानकावर थांबा मिळावा, मडूरे व सावंतवाडी येथून विशेष गाड्या,पीआरएस काऊंटर,प्रवासी सुविधा उन्नतीकरण,तुतारी एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ,स्थानकाचे आधुनिकीकरण तसेच वैभववाडी - कोल्हापूर या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी यासारख्या अनेक मागण्या रेल्वेमंत्र्यांकडे केल्या.


रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्री नितेश राणे यांच्या या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन आवश्यक ते सहकार्य व यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.मंत्री नितेश राणेंनी घेतलेल्या या भेटीमुळे कोकणवासीयांच्या गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या मागण्या आता लवकरच पूर्ण होताना दिसणार आहेत.

Comments
Add Comment

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही