अतिवृष्टीमुळे गोदामाईला पूर

नागरिकांना सावधानतेचा इशारा


नाशिक : शहरासह जिल्ह्यात मागील ४८ तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे मंगळवारी सकाळपासूनच गंगापूरसह पुनंद आणि चणकापूर धरणातून विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली. दुपारी गोदावरीला पूर आला असून सायंकाळी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी आले आहे.


प्रशासनाने नदीकाठालगतच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. गंगापूर धरणात मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ४८ दलघफू इतक्या पूर पाण्याची आवक झाली. विसर्गामुळे दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले आहे.


नाशिक शहरासह जिल्ह्याला सोमवार पाठोपाठ मंगळवारीही ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला. शहरात मध्यम सरींचा हलका वर्षाव झाला; मात्र जिल्हाभर पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर ग्रामीण भागात संततधार सुरू राहिल्यामुळे धरणांची पातळी वाढत आहे. गंगापूर समूहातील कश्यपी, गौतमी-गोदावरी ही धरणेही शंभर टक्के भरल्यामुळे या धरणांमधूनही विसर्ग गंगापूरमध्ये करण्यात येत आहे. यामुळे गंगापूरमधून विसर्गात मोठी वाढ केली जात आहे. गंगापूर धरण शंभर टक्के भरले आहे. रामकुंडात दुपारी ३ वाजता ७,२०४ क्युसेक इतके पाणी वाहत होते. रात्री ८ वाजता १५ हजार ७७६ क्युसेक इतके पाणी गंगापूर धरणातून विसर्ग केल्याने गोदावरीला पूर आला आहे.



मालेगावला पावसाने झोडपले


मालेगाव शहर व तालुक्यात घटस्थापनेच्या दिवशी पावसाने जोरदार आगमन करीत परिसराला चांगलेच झोडपले. त्यामुळे शहरासह तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून शहरात गेल्या २४ तासांत पडलेल्या ४८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चणकापूर व पुनंद धरणातील जलस्तर वाढत असल्यामुळे चणकापूरमधून १७९७७ क्युसेकने गिरणा नदीपात्रात तर अर्जुनसागर (पुनंद) धरणातून ६८०० क्युसेकने पुनंद नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. मनमाड तसेच येवला तालुक्यातही पाऊस सुरू आहे.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी