अतिवृष्टीमुळे गोदामाईला पूर

नागरिकांना सावधानतेचा इशारा


नाशिक : शहरासह जिल्ह्यात मागील ४८ तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे मंगळवारी सकाळपासूनच गंगापूरसह पुनंद आणि चणकापूर धरणातून विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली. दुपारी गोदावरीला पूर आला असून सायंकाळी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी आले आहे.


प्रशासनाने नदीकाठालगतच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. गंगापूर धरणात मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ४८ दलघफू इतक्या पूर पाण्याची आवक झाली. विसर्गामुळे दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले आहे.


नाशिक शहरासह जिल्ह्याला सोमवार पाठोपाठ मंगळवारीही ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला. शहरात मध्यम सरींचा हलका वर्षाव झाला; मात्र जिल्हाभर पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर ग्रामीण भागात संततधार सुरू राहिल्यामुळे धरणांची पातळी वाढत आहे. गंगापूर समूहातील कश्यपी, गौतमी-गोदावरी ही धरणेही शंभर टक्के भरल्यामुळे या धरणांमधूनही विसर्ग गंगापूरमध्ये करण्यात येत आहे. यामुळे गंगापूरमधून विसर्गात मोठी वाढ केली जात आहे. गंगापूर धरण शंभर टक्के भरले आहे. रामकुंडात दुपारी ३ वाजता ७,२०४ क्युसेक इतके पाणी वाहत होते. रात्री ८ वाजता १५ हजार ७७६ क्युसेक इतके पाणी गंगापूर धरणातून विसर्ग केल्याने गोदावरीला पूर आला आहे.



मालेगावला पावसाने झोडपले


मालेगाव शहर व तालुक्यात घटस्थापनेच्या दिवशी पावसाने जोरदार आगमन करीत परिसराला चांगलेच झोडपले. त्यामुळे शहरासह तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून शहरात गेल्या २४ तासांत पडलेल्या ४८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चणकापूर व पुनंद धरणातील जलस्तर वाढत असल्यामुळे चणकापूरमधून १७९७७ क्युसेकने गिरणा नदीपात्रात तर अर्जुनसागर (पुनंद) धरणातून ६८०० क्युसेकने पुनंद नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. मनमाड तसेच येवला तालुक्यातही पाऊस सुरू आहे.

Comments
Add Comment

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी