नवरात्रोत्सव आणि महालक्ष्मी यात्रेकरिता १ ऑक्टोबरपर्यंत बेस्टतर्फे जादा बससेवा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरातील 'महालक्ष्मी यात्रा' या वर्षी २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे. दरवर्षी महालक्ष्मी यात्रेदरम्यान महालक्ष्मीच्या दर्शनासाठी प्रचंड संख्येने येणाऱ्या भक्तांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमातर्फे मुंबईच्या उपनगरातून तसेच भायखाळा, महालक्ष्मी रेल्वेस्थानक येथून 'महालक्ष्मी मंदिर' दरम्यान विशेष बसगाड्यांचे प्रवर्तन करण्यात येते. शहराच्या विविध भागांमधून महालक्ष्मी मंदिर मार्गे प्रवर्तित होणाऱ्या विद्यमान बस मार्गावरील बसफेऱ्यांमध्ये देखील आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येते. महालक्ष्मी मंदिराला भेट देणारे प्रवासी मोठ्या प्रनाणावर भायखळा स्थानक व महालक्ष्मी रेल्वे स्थानक येथे उपनगरीय रेल्वेने येऊन तेथून उपक्रमाच्या बसगाड्यांचा लाभ घेतात.


या वर्षी देखील महालक्ष्मी मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या सोबीसाठी २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीमध्ये बेस्ट उपक्रमातर्फे बसमार्गावर दररोज २५ अतिरिक्त बसगाड्यांचे प्रवर्तन करण्यात येणार आहे.


प्रवाशांसाठी प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) येथून महालक्ष्मी मंदिरात जाण्याकरीता गर्दीच्यावेळी लालबाग, चिंचपोकळी, सातरस्ता व महालक्ष्मी रेल्वेस्थानक मार्गे नवरात्रोत्सवाच्या ९ दिवसांच्या कालावधीत विशेष बससेवा मोठ्या प्रमाणात चालविण्यात येणार आहेत. तरी महालक्ष्मी मात्रे दरम्यान बेस्ट उपक्रमातर्फे उपलब्ध असलेल्या विशेष बससेवेचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



त्या पुढीलप्रमाणे-


१. ए-३७ जे मेहता मार्ग ते कुर्ला स्थानक [ पश्चिम ]
२. ५७ वाळकेश्वर ते प्र. ठाकरे उद्यान (शिवडी)
३. ए-६३ भायखळा स्थानक (प) ते बीचकॅन्डी रुग्णालय
४. ७७ भायखळा स्थानक (प) ते बीचकॅन्डी रुग्णालय
५. ए-७७ जादा संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) ते
ग्रीयकॅन्डी रुग्णालय
६. ८३ कुलाबा बसस्थानक ते सांताक्रुझ आगार
७. १५१ वडाळा आगार ते ब्रीचकॅन्डी रुग्णालय
८. प-१३२ मुंबई सेंट्रल आगार ते ईलेक्ट्रीक हाऊस
९. ए-३५७ मुंबई सेंट्रल आगार ते शिवाजीनगर आगार
१०.विशेष प्र. ठाकरे उद्यान (शिवडी) ते
महालक्ष्मी मंदिर

Comments
Add Comment

राज्यात बीड, सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस, पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा

सोलापूर/बीड: महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक

अरुण गवळी तुरुंगातून बाहेर, आता लेक योगिता गवळी राजकारणात सक्रिय!

मुंबई: अनेक वर्षांनी तुरुंगातून बाहेर आलेले माजी आमदार अरुण गवळी यांनी आता राजकारणात सक्रिय होणार नसल्याचे

मत्स्यव्यवसाय विकासासाठी बजेट वाढवा; मंत्री नितेश राणे यांच्याकडे मत्स्यशेतकऱ्यांची मागणी

मुंबई : राज्यातील मत्स्यशेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे सक्षमीकरण यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश

परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’

‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी पॉड टॅक्सी सेवा नागरिकांच्या सेवेत आणावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

Rain Update : राज्यात २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान पावसात वाढ होण्याची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत मुंबई : २४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा

२६ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत मुंबई : २४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा