नवरात्रौत्सव २०२५: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उपवास अनुभव आणि दिनक्रम

आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात भक्त देवीची भक्तिभावाने ९ दिवस पूजा करतात. या काळात व्रत करण्याला अधिक महत्व दिले जाते. देवीचा आशीर्वाद मिळण्यासाठी हे व्रत केले जाते. हे व्रत सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने पाळतात, काही लोक ९ दिवस अनवाणी चालण्याचे व्रत ठेवतात तर काही लोक ९ दिवस उपवास करतात. उपवास करताना काही जण केवळ फलाहार करतात.

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रीच्या संपूर्ण नऊ दिवसांचा उपवास करतात आणि त्याच्या कठोर व्रताचे पालन करतात. त्यांच्या उपवासाच्या अनुभवावरून अनेकांना प्रेरणा मिळते. त्यांच्या या काळातील दिनक्रमाबाबत सविस्तर जाणून घेऊया .

पंतप्रधान मोदींचा नवरात्र उपवासाचा अनुभव


पंतप्रधान मोदी म्हणतात की उपवास म्हणजे केवळ अन्न न खाणे नाही, तर एक प्रकारची शरीरशुद्धी आणि शिस्त आहे. उपवास करताना ते स्वतःला एकटं ठेवतात आणि त्यातून एक वेगळीच शांती आणि ऊर्जा प्राप्त करतात. त्यांच्या मते उपवास हे एक सायन्स आहे, ज्याचा अनुभव त्यांनी बालपणी घेतला.

उपवास करण्यापूर्वीची तयारी

शरीर स्वच्छ करणे: उपवास सुरू करण्यापूर्वी ते योग आणि आयुर्वेदाच्या मदतीने ५ ते ७ दिवस शरीरातील टॉक्सिन्स काढतात.

पाण्याचे सेवन: उपवासाच्या दिवसांपूर्वी भरपूर पाणी प्यायचे, ज्यामुळे शरीर विषमुक्त होते आणि शरीराला उपवासासाठी तयार करता येते.

उपवासाचा दिनक्रम

पंतप्रधान मोदी उपवासाच्या काळातही नियमित कामकाज करतात. त्यांच्या मते, उपवासामुळे ऊर्जा कमी होत नाही तर वाढते.

उपवास करताना ते एकांतात राहतात.

उपवासाच्या काळात विचार करण्याची प्रक्रिया वेगळी आणि ताजी होते, ज्यामुळे नवीन कल्पना आणि ऊर्जा मिळते.

उपवासाचे फायदे

शरीर आणि मनाची शुध्दी होते.

पचनशक्ती सुधारते.

मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढते.

ऊर्जा आणि शक्तीची जाणीव होते.

पंतप्रधान मोदींचा उपवासाचा प्रेरणादायक अनुभव

लहानपणी महात्मा गांधींच्या गायींच्या रक्षणासाठी एक दिवसाचा उपवास त्यांनी अनुभवला. तेव्हा भूक लागल्याचा त्यांना पहिल्यांदा वेगळा अनुभव आला आणि त्यांनी उपवासाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी स्वतःला हळूहळू उपवासासाठी तयार केले.

पंतप्रधान मोदींचा उपवास अनुभव हे केवळ एक धार्मिक कृत्य नाही, तर तो आत्मशिस्त आणि आरोग्यासाठी एक महत्वपूर्ण प्रक्रिया आहे. नवरात्रीच्या पवित्र काळात उपवास करताना त्यांच्या दिनक्रमाचे आणि अनुभवाचे अनुसरण करून आपणही शरीर व मनाला नवे ताजेपणा देऊ शकतो.
Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे