Money : आता वर्षाला २.५ लाखांपर्यंत होणार तुमची बचत...

मुंबई : घटस्थापनेच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने आजपासून नवीन जीएसटी दर लागू केले. या महत्वपूर्ण निर्णयामुळे मध्यमवर्गीयांना कारपासून ते स्वयंपाकघरातील बहुतांश वस्तू खरेदी करताना मोठा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला आयकरातून सूट देण्यात आली होती. आता जीएसटी नवीन दर लागू झाल्यामुळे, लोकांच्या मनात हा प्रश्न रेंगाळत आहे की किमती कमी झाल्यानंतर मध्यमवर्गीय दरमहा किती पैसे वाचवेल.


या सर्व बदलांचा विचार केला तर वार्षिक १२ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबाला दरमहा साधारण ११,००० ते १२,००० रुपयांची बचत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या भाषणात म्हटल्याप्रमाणे, आयकर आणि जीएसटी कपातीमुळे देशातील लोकांना मिळणारी एकत्रित बचत २.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. जर ही बचत दरमहा एसआयपीद्वारे १२% परताव्यावर गुंतवली तर पुढील १० वर्षांत जवळपास २५ लाख रुपयांचा निधी तयार होऊ शकतो.


दरम्यान, जीएसटी कौन्सिलने ३ सप्टेंबरला घेतलेल्या निर्णयानुसार ५%, १२%, १८% आणि २८% असे चार करस्लॅब कमी करून आता केवळ ५% आणि १८% स्लॅब लागू केले आहेत. तंबाखू व लक्झरी वस्तूंवर मात्र अतिरिक्त कर कायम राहणार आहे. या बदलामुळे साबण, टूथपेस्ट, शाम्पू, स्वयंपाकघरातील भांडी, शालेय साहित्य, औषधे, दूध, चीज, बटर, बिस्किटे, स्नॅक्स आणि नूडल्स यांसारख्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. दरमहा ५,००० रुपयांच्या दैनंदिन वस्तूंच्या खर्चावर साधारण ५०० रुपये तर खाद्यपदार्थांवरच्या ८,००० रुपये ते १०,००० रुपयांच्या खर्चावर ८०० रुपये ते १,००० रुपयांची बचत होईल.


वाहनांवरील करही मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला आहे. कार, दुचाकी आणि तीनचाकी वाहनांवरील कर २८% वरून १८% करण्यात आला असून सायकलींवरचा कर १२% वरून ५% केला आहे. यामुळे लाखभराच्या दुचाकीवर थेट १०,०००, सहा ते आठ लाखांच्या कारवर ६०,००० रुपये ते ८०,००० आणि तीन लाखांच्या ऑटो रिक्षावर ३०,००० रुपयांची बचत होईल. वाहनांच्या सुटे भागही १०% स्वस्त होणार असल्याने देखभालीचा खर्च कमी होईल.


घर बांधताना लागणाऱ्या सिमेंट, ग्रॅनाइट, संगमरवरी व बांबूसारख्या साहित्यांवरील कर कमी करण्यात आल्याने ५० लाखांच्या घरावर साधारण ३ ते ४ लाख रुपयांची थेट बचत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्येही दिलासा मिळणार आहे. ४०,००० रुपयांच्या टीव्हीवर ४,००० रुपये, ३५,००० च्या एसीवर ३,५०० रुपये आणि ६०,००० रुपयांच्या सोलर वॉटर हीटरवर तब्बल ७,००० रुपये स्वस्त होणार आहेत.


नवीन करप्रणालीनुसार १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर आता कोणताही कर लागणार नाही. यामुळे वार्षिक १२ लाख रुपये पगार असलेल्या व्यक्तीला दरमहा साधारण ७,८०० रुपये तर वार्षिक १० लाख पगार असलेल्या व्यक्तीला ५,२०० रुपये आणि वार्षिक ८ लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीला सुमारे ३,००० रुपये दरमहा बचत होणार आहे. ३०,००० किंवा ५०,००० रुपये पगार असलेल्यांसाठी मात्र पूर्वीप्रमाणेच करमाफी असल्याने अतिरिक्त फायदा होणार नाही.


सणासुदीच्या हंगामात लागू झालेल्या या निर्णयांमुळे वाहन, घरगुती उपकरणे आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी करणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या खिशात प्रत्यक्ष बचतीच्या स्वरूपात दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या