सचिन आला आणि शिवाजी पार्कमधलं वातावरण एकदम बदललं


मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर असलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हस्ते झालं. शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा एकदा क्रीडापटूंसाठी सुरू झाला. मागील दीड वर्षापासून शिवाजी पार्क जिमखान्याचे नूतनीकरण सुरू होते. घटस्थापनेच्या दिवशी सकाळीच सचिनच्या हस्ते जिमखान्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाले. याप्रसंगी मनसे प्रमुख राज ठाकरे, मंत्री आशिष शेलार जिमखान्याचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.



'मुलींसाठी ही व्यवस्था सर्व जिमखान्यांवर हवीच'


शिवाजी पार्क जिमखाना नूतनीकरणाच्या कामात राज ठाकरे यांचे उल्लेखनीय योगदान आहे. जिमखान्याचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनीही विचारपूर्वक काम केले. खेळाडूंसाठी उत्तम सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या. जिमखान्यात मुलांप्रमाणेच मुलींसाठीही कपडे बदलण्यासाठी चांगली व्यवस्था आहे. ही व्यवस्था कौतुकास्पद आहे. आता क्रीडा क्षेत्रात मुलांप्रमाणेच मुलीही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यामुळे देशातील सर्व जिमखान्यांमध्ये मुलांप्रमाणेच मुलींसाठीही कपडे बदलण्यासाठी चांगली व्यवस्था असणे आवश्यक आहे, असे सचिन म्हणाला. त्याने जिमखान्याच्या नव्या इमारतीच्या कामाचे तसेच यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या सर्वांचेच अभिनंदन केले.


Comments
Add Comment

पावसामुळे पाचवा सामना रद्द, भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या

आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने मांडला आशिया कपचा मुद्दा, समस्येवर मार्ग काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई : भारताने आशिया चषक २०२५ जिंकला पण विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय संघाने आशियाई

ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात

पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले

मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.