सुपर संडे, थोड्याच वेळात सुरू होणार भारत - पाकिस्तान सामना; कोण खेळणार ?


दुबई : आशिया कप २०२५ स्पर्धेतील सुपर फोर फेरीतील भारत - पाकिस्तान हा टी २० सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे हा सामना रंगणार आहे.


सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा पाकिस्तानचा सामना करण्यास सज्ज झाला आहे. दोन्ही देश आठवड्याभरात पुन्हा आमनेसामने येत आहेत. याआधी आशिया कपच्या साखळी फेरीत झालेल्या पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारतीय क्रिकेटपटूंनी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता.


पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी भारतात पहलगाम येथे हल्ला करुन निष्पाप पर्यटकांची क्रूरपणे हत्या केली होती. या घटनेचा निषेध म्हणून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नसल्याची भूमिका भारतीय क्रिकेटपटूंनी घेतली. आशिया कप ही बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम पाळणे आवश्यक असल्यामुळे भारत पाकिस्तान विरुद्ध खेळेल पण पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना हस्तांदोलन करणार नाही, अशी भूमिका भारतीय खेळाडूंनी घेतली. भारतीय क्रिकेटपटूंच्या या भूमिकेला भारतीय क्रिकेटप्रेमींचा पाठिंबा मिळाला. साखळी सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. पण पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना पराभवापेक्षा हस्तांदोलनाचा मुद्दा जिव्हारी लागला. यानंतर पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनाने एशियन क्रिकेट काउन्सिलकडे तक्रार केली. पण त्यांच्या तक्रारीनंतर भारतावर कारवाई झाली नाही. या प्रकारात पाकिस्तानची आणखी छी थू झाली. अशा वातावरणात भारत पाकिस्तान पुन्हा समोरासमोर येत आहेत. विशेष म्हणजे साखळी सामन्यापाठोपाठ सुपर फोर फेरीतील सामन्यासाठीही सामनाधिकारी म्हणून अँडी पायक्रॉफ्ट यांचीच नियुक्ती झाली आहे. यामुळे पुढे काय होणार ? याकडे अनेकांचे लक्ष आहे.


टी २० क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध आतापर्यंत भारताचे पारडे जड राहिल्याचे चित्र आहे. यामुळे टीम इंडियाकडून भारतीय क्रिकेटप्रेमींन भरपूर अपेक्षा आहेत. भारत १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्धचा सामना सात विकेट राखून जिंकला. यानंतर भारत १९ सप्टेंबर रोजी ओमान विरूद्धचा सामना २१ धावांनी जिंकला. ओमान विरूद्धच्या सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजीत अनेक प्रयोग केले. यामुळे ४८ तासांपेक्षा कमी वेळात पुन्हा मैदानात उतरत असलेला भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध कसे डावपेच आखणार यावरुन मोठ्या प्रमाणात तर्कवितर्क सुरू आहेत.




  1. भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल/अर्शदीप सिंग.

  2. पाकिस्तानची संभाव्य इलेव्हन: साहिबजादा फरहान, सॅम अयुब, फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.

  3. भारत-पाकिस्तान सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल, तर सोनी लिव्ह अॅपवर थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल. सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल आणि टॉस (नाणेफेक) सायंकाळी ७:३० वाजता होईल.


Comments
Add Comment

IPL Playoff 2026 : RCB, GT, SRH आणि राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये दाखल

मुंबई : आयपीएल २०२६ च्या अंतिम टप्प्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात राजस्थान रॉयल्सने

IPL मध्ये लाजिरवाणी घटना! चिअरलिडर्ससोबत दुर्व्यवहार ; मैदानातच रंगला हायव्होल्टेज ड्रामा

LSG VS PBKS : आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यादरम्यान एक अत्यंत

IPL प्रसारणामधील “सलाम मुंबई” ऐवजी “नमस्कार मुंबई” प्रदर्शित करण्याची भाजयुमो, मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांची मागणी

IPL  2026 : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष श्री दिपक सिंह यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री

Sara Tendulkar : अर्जुनच्या पदार्पणाने तेंडुलकर कुटुंब भावूक; बहिण सारा आणि पत्नी सानियाची खास पोस्ट चर्चेत

IPL 2026 LSG VS PBKS : आयपीएल २०२६ मध्ये अखेर सचिन तेंडुलकरच्या मुलाला लखनउ सुपर जायंट्सकडून खेळण्याची संधी मिळाली.

KKR vs DC : आज आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्ध केकेआर आमने सामने, केकेआरकडे प्लेऑफमध्ये जाण्याची शेवटची संधी

IPL 2026 : आयपीएल 2026 मधील लीग टप्प्यातील अखेरचा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार

IPL 2006 : कोलकातासाठी विजय अनिवार्य

- सुशील परब कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२६ मधील साखळी फेरीतील महत्त्वाचा सामना