राहुरीत पोलिसांचा मोठा छापा : ३१ लाखांचे अवैध फटाके जप्त

राहुरी : राहुरी तालुक्यातील चिंचोली गावात आज पोलिसांनी मोठी कारवाई करत विनापरवाना साठवून ठेवलेले फटाके जप्त केले आहेत. या छाप्यामध्ये तब्बल ३१ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई सुमित नंदकुमार रांका यांच्या मालकीच्या सुमित ट्रेडर्स या दुकानावर करण्यात आली असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


फटाके बेकायदेशीरपणे साठवून ठेवल्याबाबत सुरज गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा रजिस्टर नं. १०७४/२५ अन्वये भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियम (बीएनएस ९ (ब)) अंतर्गत सुमित रांका (वय ३१, रा. चिंचोली) यांच्याविरोधात कारवाई झाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ हे करत आहेत.


सध्या जिल्ह्यातील सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर फटाक्यांची विक्री वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे आग लागणे, अपघात होणे अशा घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.


?si=NnZ2ne9oqaWNLrkk

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण जिल्ह्यात तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. परवाना नसलेल्या विक्रेत्यांविरुद्ध आणि सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.


राहुरी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, फटाके खरेदी करताना अधिकृत परवानाधारक दुकानांमधूनच खरेदी करावी. कुठेही अवैध फटाक्यांचा साठा किंवा विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास, तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.


या कारवाईनंतर जिल्ह्यातील इतर बेकायदेशीर विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नियमभंग करणाऱ्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही.

Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय