मेट्रो मार्ग ४ व ४ए प्रकल्प हे ठाणेकरांसाठी नवे श्वासवायू - परिवहन मंत्री

मुंबई : मुंबई व ठाणेकरांसाठी वाहतुकीच्या समस्येचे समाधान म्हणून महत्त्वाकांक्षी ठरणारा मेट्रो मार्ग ४ व ४ए (हिरवी मार्गिका) प्रकल्पाला गती मिळाली आहे. वडाळा–घाटकोपर–मुलुंड–कासारवडवली–गायमुख या मार्गावर उभारण्यात येणारा हा प्रकल्प केवळ प्रवाससुविधा निर्माण करणार नाही, तर शहराच्या आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय विकासालाही चालना देईल. असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.


मंत्री सरनाईक म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ठाण्याच्या जनतेचे मेट्रो मधून प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे. याबरोबरच गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे भविष्यात घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.


वैशिष्ट्ये..


मार्गाची एकूण लांबी ३५.२० कि.मी. असून यात मेट्रो मार्गिका ४ – ३२.३२ कि.मी. व ४ए – २.८८ कि.मी. आहे.


गाड्या ८ डब्यांच्या असतील व प्रतितास प्रतिदिशा प्रवासी संख्या (PHPDT) ३३,४१७ एवढी असेल.


ठाणेकरांसाठी फायदेशीर पाऊल


मेट्रो मार्ग ४ पूर्ण झाल्यानंतर पूर्व व पश्चिम उपनगरांमधील दुवा अधिक मजबूत होणार आहे. यामुळे व्यवसाय केंद्रे, औद्योगिक पट्टे आणि शैक्षणिक संस्थांना थेट फायदा मिळणार आहे.


हा मार्ग दक्षिणेला मेट्रो मार्ग ११ (वडाळा–सीएसटीएम) व उत्तरेला मेट्रो मार्ग ४ए (कासारवडवली–गायमुख) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग १० (गायमुख–मीरा रोड) यांच्याशी जोडला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई–ठाणेकरांसाठी अखंड प्रवासाची सोय होणार आहे.


या विस्तारानंतर एकूण लांबी ५८ कि.मी. होणार असून हा भारतातील सर्वात मोठा मेट्रो मार्ग ठरेल. दररोज तब्बल २१.६२ लाख प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा आहे.


प्रवास वेळेत ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत बचत होणार असून नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे.


ठाणे सारख्या महानगराला आधुनिक वाहतुकीची कास धरावी लागणार हे वास्तव आता टाळता येणार नाही. मेट्रो मार्ग ४ व ४ए या दृष्टीने नवा टप्पा ठरेल. आज वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि तासन्‌तास वाया जाणारा वेळ हे सर्व प्रश्न जटिल झाले आहेत. अशा वेळी पर्यावरणपूरक, सुरक्षित व जलदगती मेट्रो हा प्रवासाचा नवा पर्याय ठरेल.

Comments
Add Comment

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

धक्कादायक! हॉस्पिटलच्या टीमनेच केला नवजात बाळाचा ३ महिन्यापेक्षा अधिक सांभाळ

सांगली : सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५

Dr. Jaysingrao Pawar : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

- मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव

जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील

रामनवमीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद राहतील

पुणे: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र

Ashok Kharat: व्हायरल व्हिडीओने खळबळ, अशोक खरात एचआयव्ही पॉझिटिव्ह?

मुंबई: महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवे धक्कादायक