अकरावी प्रवेशाची शेवटची संधी


मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण राज्यातील अकरावीची अर्थात FYJC ची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू आहे. आता सोमवार २२ सप्टेंबर २०२५ पासून अकरावीच्या अर्थात FYJC च्या प्रवेशाची अंतिम फेरी सुरू होत आहे. राज्यातील अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरलेले सुमारे १० हजार विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांना २२ ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या निमित्ताने अंतिम संधी मिळेल. यात फेब्रुवारी-मार्च परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या, पण जुलैमधील फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.


यंदा राज्यभरातून १४ लाख ८५ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. आतापर्यंत १३ लाख ३३ हजार ८९३ विद्यार्थ्यांनी राज्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. उर्वरित नोंदणी केलेल्या पण कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. या संधीचा वापर करुन संबंधितांनी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा आणि पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.


अंतिम फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालयांमधील रिक्त जागा जाहीर करणे, कोट्याच्या जागा जाहीर करणे, प्रवेशक्षमता वाढवणे आदी प्रक्रिया २२ सप्टेंबर रोजी केल्या जातील. यानंतर २२ आणि २३ सप्टेंबरला नवीन विद्यार्थी नोंदणी, अर्जाच्या भाग १ मध्ये दुरुस्ती करणे, प्राधान्यक्रम देणे, आदी गोष्टींसाठी मुदत देण्यात आली आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे, ती महाविद्यालये २४ आणि २५ सप्टेंबर या दोन दिवसांत संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना प्रवेशासाठी बोलावतील. महत्त्वाचे म्हणजे २५ सप्टेंबर ही प्रवेशाची अंतिम मुदत असेल. या मुदतीनंतर विद्यार्थ्यांना पुढील संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.


Comments
Add Comment

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा; आमदार प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी

मुंबई : हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन