अकरावी प्रवेशाची शेवटची संधी


मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण राज्यातील अकरावीची अर्थात FYJC ची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू आहे. आता सोमवार २२ सप्टेंबर २०२५ पासून अकरावीच्या अर्थात FYJC च्या प्रवेशाची अंतिम फेरी सुरू होत आहे. राज्यातील अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरलेले सुमारे १० हजार विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांना २२ ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या निमित्ताने अंतिम संधी मिळेल. यात फेब्रुवारी-मार्च परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या, पण जुलैमधील फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.


यंदा राज्यभरातून १४ लाख ८५ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. आतापर्यंत १३ लाख ३३ हजार ८९३ विद्यार्थ्यांनी राज्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. उर्वरित नोंदणी केलेल्या पण कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. या संधीचा वापर करुन संबंधितांनी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा आणि पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.


अंतिम फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालयांमधील रिक्त जागा जाहीर करणे, कोट्याच्या जागा जाहीर करणे, प्रवेशक्षमता वाढवणे आदी प्रक्रिया २२ सप्टेंबर रोजी केल्या जातील. यानंतर २२ आणि २३ सप्टेंबरला नवीन विद्यार्थी नोंदणी, अर्जाच्या भाग १ मध्ये दुरुस्ती करणे, प्राधान्यक्रम देणे, आदी गोष्टींसाठी मुदत देण्यात आली आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे, ती महाविद्यालये २४ आणि २५ सप्टेंबर या दोन दिवसांत संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना प्रवेशासाठी बोलावतील. महत्त्वाचे म्हणजे २५ सप्टेंबर ही प्रवेशाची अंतिम मुदत असेल. या मुदतीनंतर विद्यार्थ्यांना पुढील संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.


Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला