Govind Barge case: सोन्याचे दागिने, प्लॉट, बुलेट ते शेतजमीन... तरी तिची भूक भागली नाही, गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट!

बीड: गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यांनी नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड घराबाहेरच स्वत:वर गोळी झाडून घेतली, या घटनेनंतर संपूर्ण राज्य हादरले होते. त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांकडून मोठी अपडेट समोर आली आहे.


गोविंद बर्गे यांनी प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी समोर आले होते. कला केंद्रात असलेली नर्तकी पूजा गायकवाडच्या प्रेमात बर्गे पूर्णपणे वेडे झाले होते. तिच्यासाठी ते काहीही करायला तयार होते.


गोविंद बर्गे यांनी नर्तकी पूजा गायकवाड हिला सोन्याचे दागिने, सोन्याची नाणी, प्लॉट, बुलेट, आयफोन, शेतजमीन एवढंच नाही तर घर देखील बांधून दिले होते. मात्र तरीही पुजा समाधानी नव्हती. तिची नजर ही गोविंद बर्गे यांच्या गेवराईच्या बंगल्यावर होती. हा बंगला माझ्या नावावर करून दे अशी मागणी तिने गोविंद बर्गे यांच्याकडे केली होती. मात्र गोविंद बर्गे हे तिला गेवराईचा बंगला देण्यास तयार नव्हते, त्यासाठी ती सातत्याने त्यांच्यावर दबाव टाकत होती, याच दबावातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार