सात महिन्यांत राज्यात आणखी १४.७१ लाख नव्या मतदारांची भर

सात महिन्यांत राज्यात आणखी १४.७१ लाख नव्या मतदारांची भर


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट परिणाम


मुंबई (प्रतिनिधी) :
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अवघ्या सहा महिन्यांत ४०.८१ लाख मतदारांची वाढ झाल्याबाबत विरोधकांकडून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यांत राज्यात आणखी १४.७१ लाख नव्या मतदारांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, ही वाढ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट परिणाम करणारी ठरणार आहे.
२७ नोव्हेंबर २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीत राज्यातील मतदारांची संख्या ९,७०,२५,११९ वरून ९,८४,९६,६२६ इतकी झाली आहे. म्हणजेच एकूण १८,८०,५५३ नव्या मतदारांनी नोंदणी केली आहे. याचदरम्यान ४,०९,०४६ जुन्या मतदारांची नावे वगळण्यात आली असून, अंतिमतः एकूण १४,७१,५०७ मतदारांची वाढ झालेली आहे. गेल्या निवडणुकांदरम्यान मतदार यादीतील आकडेवारीवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांनी मात्र या नवीन वाढीव मतदारांविषयी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार निवडणूक आयोगाकडे नोंदवलेली नाही.


डिजिटल स्वरूपात मतदारयादी उपलब्ध
नवीन मतदारयादी मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होती, मात्र त्यावर कोणाच्या हरकती अद्याप आल्या नसल्याचेही समजते. नवीन मतदारयादी केंद्रीय निवडणूक कार्यालयाने आयोगाला मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत 'डिजिटल' स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे.


घरबदलामुळेही मोठ्या प्रमाणावर नोंदणी
या नव्या मतदारांपैकी १.९६ लाख मतदार हे घरबदलामुळे म्हणजेच एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतर झाल्यामुळे नव्याने नोंदले गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक वाढ पुणे (३२,०३१), ठाणे (२७,३८६), आणि मुंबई उपनगर (२५,८३१) या जिल्ह्यांमध्ये झाली आहे.


सर्वाधिक मतदार वगळलेले पाच टॉपचे जिल्हे
ठाणे : ४५ हजार ८००.
मुंबई उपनगरे : ४४ हजार १७२.
पुणे : ४३ हजार ९६१.
नाशिक : ३५ हजार ४७९.
जळगाव : २६ हजार ६३९.
सर्वाधिक मतदार वाढलेले पाच टॉपचे जिल्हे
ठाणे : २ लाख २५ हजार ८६६.
पुणे : १ लाख ८२ हजार ४९०.
पालघर : ९७ हजार १००.
मुंबई उपनगरे : ९५ हजार ६३०.
नागपूर : ७० हजार ६९३.


सर्वाधिक मतदार असलेले टॉपचे पाच जिल्हे
पुणे :
९० लाख ३२ हजार ८०.
मुंबई उपनगरे :
७७ हजार ८१ हजार ७२८.
ठाणे :
७४ लाख ५५ हजार २०५.
नाशिक :
५१ लाख २८ हजार ९७४.
नागपूर :
४५ लाख ९६ हजार ६९०.

Comments
Add Comment

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल