२० तलवारींसह मुस्लिम तरुणाला अटक, कोणता कट शिजत होता?

जळगाव : दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत. याच दरम्यान जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा शहरात अवैधरित्या बाळगलेल्या २० तलवारी जप्त करून एका तरुणाला ही अटक करण्यात आली आहे. सोहेल शेख तब्युब शेख (वय २४, रा. स्मशान भूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून या कारवाईत सुमारे ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, माहिजी नाका परिसरात काही तलवारी विक्रीसाठी आणल्या जात आहेत.


त्या माहितीनुसार, माहिजी नाका परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी सोहेल शेख तब्युब शेख याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने तलवारी विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १८ तलवारी जप्त करण्यात आल्या. तर कारवाईपूर्वी विक्री केलेल्या २ तलवारीही पोलिसांनी संशयितांकडून हस्तगत केल्या आहेत.


या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४६०/२०२५ नुसार भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

साताऱ्यात खळबळ: यशवंत बँकेत ११२ कोटींचा महाघोटाळा; माजी अध्यक्षांसह ५० जणांवर गुन्हा दाखल

बनावट कर्ज, कागदपत्रांमध्ये फेरफार; ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या निधीचा उद्देशबाह्य वापर करून केलेला आर्थिक

पलंगावरुन पडला आणि पोलीस अंमलदाराचा घात झाला

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस दलातील एका तरुण वाहतूक पोलीस अंमलदाराच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

मुंबईत पावसाची शक्यता कमी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेईल, असा

राज्यातील सरकारी शाळेत मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण

गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पायाभूत ज्ञान दृढ करण्यावर शासनाने भर दिला आहे. या उद्देशाने

भाजपाचे विकासाचे, याउलट काँग्रेसचे विनाशाचे राजकारण - बावनकुळे

नागपूर : भाजप कार्यकर्त्यांनी नेहमीच जनसेवकाच्या भूमिकेतून विकासाचे राजकारण केले आहे. काँग्रेसने

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे पर्यटक तरुणी ४० फूट खोल दरीत कोसळली

राजगड : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. त्यामुळे पर्यटकांची पळापळ झाली.