राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

मुंबईत पावसाची शक्यता कमी


ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेईल, असा अंदाज हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी वर्तवला होता. परंतु आताच्या ताज्या अहवालानुसार, राज्यात १५ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठं आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके पाऊस, वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावी, अशा सूचना सरकारने शेतकऱ्यांना दिल्या आहेत.


मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी हवामान पूर्णपणे कोरडं असल्याचं पाहायला मिळालं. नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र १५ ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. पाऊस पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाड्याला झोडपून काढू शकतो. येथील अनेक भागात ढगाळ हवामान किंवा वादळी पावसाची शक्यता राहील. तर खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या जोरदार सरी बरसू शकतात.


मुंबई, पुणे, मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पाऊस माघार घेईल, असा अंदाज होता. मुंबईतून पावसाने निरोप घेतल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं होतं. दसऱ्यापर्यंत म्हणजेच २ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागात पावासाच्या सरी कोसळल्या होत्या. ५ किंवा ६ ऑक्टोबरपासून पाऊस परतीच्या प्रवासाला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण अद्याप तरी मुंबईत पावसाने दडी मारली आहे. १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वादळी पावसाचा मुंबईवर परिणाम होण्याची शक्यता कमी दिसत आहे.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वेने साजरा केला जागतिक वारसा दिन

मुंबई : मध्य रेल्वेने जागतिक वारसा दिन-२०२६ उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ व मध्य

ATS : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे राज्यातील लाखो वाहतूक व्यावसायिकांना दिलासा

मुंबई : 'एटीएस' (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीतील तांत्रिक बदलांमुळे रखडलेली वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रिया

Uninterrupted Power Supply : अखंड वीजपुरवठ्यासाठी राज्यात होणार ‘एआय’चा वापर

मुंबई : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची विक्रमी मागणी पूर्ण करतानाच, वीजनिर्मिती आणि पुरवठ्यात

Data Centers in Maharashtra : मध्य आशियातील नामांकित कंपन्या महाराष्ट्रात डेटा सेंटर स्थापन करणार

मुंबई : राज्यातील उद्योगस्नेही वातावरणाचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून, मध्य आशियातील डेटा सेंटर

Rain In Maharashtra : उष्माघातानंतर राज्यासमोर वादळी पावसाचे संकट

मुंबई : पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२

New Law : जमीनधारक होणार विकास प्रक्रियेत भागीदार

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या ‘मुंबई ३.०’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मुंबई महानगर