मेगाभरती ! पुण्यात मेट्रो-३ च्या सर्व गाड्या महिला पायलट चालवणार

पुणे : पुण्यात मेट्रोचे काम अगदी जोमात सुरु आहे. येत्या काही महिन्यात आयटी हब असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो धावणार आहे. 'मेट्रो लाईन 3' असं नाव असलेली ही मेट्रो पुणे शहरातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे.


या मार्गातील मेट्रो व्यवस्थापनाचे काम एका परदेशी कंपनीने हाती घेतले आहे. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने 'केओलिस' या फ्रेंच कंपनीसोबत करार केला असून ही फ्रेंच कंपनी पुणे मेट्रोच्या हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेचं व्यवस्थापन करणार आहे. अल्स्टॉम कंपनीच्या मेट्रो गाड्यांची देखभाल यासह २३ स्टेशन्सवरील तिकीट व्यवस्थेची जबाबदारी केओलिस कंपनीकडे असणार आहे .


हे काम हाती घेण्याआधी 'केओलिस' कंपनीने एक महत्वाची घोषणा केली आहे . हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कॉरिडॉरवर सर्व महिला मेट्रो पायलट ठेवण्याची महत्वाची घोषणा कंपनीने केली आहे .


कंपनीने दिलेल्या सविस्तर वृत्तानुसार, "हा भारतातील एक अभूतपूर्व उपक्रम आहे. पुण्यातील मेट्रो लाईन ३ वरील सर्व गाड्या महिला पायलट चालवतील. यासाठी सुमारे १०० महिला पायलट्सची मेगाभरती केली जाईल. यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याची योजना सुरु आहे .

Comments
Add Comment

मगरपट्ट्याच्या मागील बाजूस कॅनल फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी

पुणे : मगरपट्टा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असून

पुणे - मुंढव्यातील पासपोर्ट कार्यालय पाषाणला स्थलांतरित होणार

पुणे : परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) आता कायमस्वरूपी

सोलापूर महापालिका व जिल्हा परिषदेवर भाजपचा दबदबा - विरोधी पक्षनेत्याशिवायच कारभार सुरू

सोलापूर : सोलापूर महापालिकेत १०२ पैकी ८७ जागा भाजपने जिंकल्या असून, आठ जागा मिळविलेला एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर

Ashok Kharat Case: दोन महिने आधी प्रकरण बाहेर, मात्र खरातला वाचण्यासाठी कुणी ताकद लावली?

नाशिक: लैंगिक शोषण प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर आता खरातचे विकृत कारनामे समोर येऊ लागले आहेत. अशोक

Weather Update: महाराष्ट्रात २४ तासात हवानमान बदलणार, पश्चिम महाराष्ट्रात गारपीट तर ५ जिल्ह्यांत हिटवेवटचा इशारा

मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीला उकाडा प्रचंड वाढला होता. मात्र त्यानंतर तुफान गारपीट झाली. हीच गारपीट आता

मराठमोळा शिव ठाकरे ठरला 'द ५० इंडिया' शोचा विजेता

मुंबई: मराठी अभिनेता शिव ठाकरे याने 'द ५० इंडिया' शोच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे. त्याने 'द ५० इंडिया' ट्रॉफी आणि