'काम होणार नसेल तर खुर्ची खाली करा': अजितदादांचा कामचुकार मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा; अजितदादा कोणावर भडकले?

नागपूर: 'लोकांची कामे होणार नसतील, तर खुर्ची खाली करा,' असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिला आहे. नागपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात बोलताना त्यांनी कामचुकार मंत्र्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.


एक दिवस पक्ष सांगतो त्यावेळी तुम्ही वेळ देऊ शकत नाही. यापुढे जबाबदारी आल्यावर भान ठेवले पाहिजे. मंत्री महोदयांना पक्षापेक्षा काम जास्त असेल तर त्यांनी आपलं पद मोकळं करायला हरकत नाही. पालकमंत्री ज्यांना मिळाले आहे त्यांनी इतर दिवशी जावंच लागेल. आणि लोकांची कामे पूर्ण करा. लोकांची कामे होणार नसेल तर खुर्ची खाली करावी लागेल, असा इशारा वजा सज्जड दम अजितदादांनी जाहीरपणे बोलताना दिला.



चिंतन शिबिरातून 'नागपूर डिक्लेरेशन'


अजित पवार म्हणाले की, हे शिबिर केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नसून, पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे आहे. शिबिरातून तयार होणारा आराखडा 'नागपूर डिक्लेरेशन' म्हणून मांडला जाईल. यातून धाडसी आणि ठोस निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.



जनतेला हेलपाटे मारायला लावू नका


अजित पवार यांनी सर्वधर्मसमभाव आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेनुसार पक्ष काम करत असल्याचे सांगितले. तसेच, 'सत्ता किंवा पदासाठी आम्ही महायुतीत सामील झालो नाही, तर राज्याची प्रगती व्हावी आणि ठोस निर्णय घेता यावा म्हणून आलो,' असेही त्यांनी नमूद केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि मंत्र्यांना त्यांनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आवाहन केले. 'जनतेला हेलपाटे मारायला लावू नका,' असा थेट आदेश देत त्यांनी सरकार आणि पक्ष यांच्यातील समन्वय अधिक घट्ट करण्याचे निर्देश दिले.



'जनसंवाद' मोहीम


पुढील काळात प्रत्येक कार्यकर्ता जनतेशी जोडला जावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी जनसंवादाचा कार्यक्रम घेतला जाईल, अशी घोषणा अजित पवारांनी केली. तसेच, दर महिन्याला नवीन मोहीम आणि विषय घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींचा अंदाज; २५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात रविवारचा दिवस पावसाळी ठरण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली