'काम होणार नसेल तर खुर्ची खाली करा': अजितदादांचा कामचुकार मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा; अजितदादा कोणावर भडकले?

नागपूर: 'लोकांची कामे होणार नसतील, तर खुर्ची खाली करा,' असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिला आहे. नागपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात बोलताना त्यांनी कामचुकार मंत्र्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.


एक दिवस पक्ष सांगतो त्यावेळी तुम्ही वेळ देऊ शकत नाही. यापुढे जबाबदारी आल्यावर भान ठेवले पाहिजे. मंत्री महोदयांना पक्षापेक्षा काम जास्त असेल तर त्यांनी आपलं पद मोकळं करायला हरकत नाही. पालकमंत्री ज्यांना मिळाले आहे त्यांनी इतर दिवशी जावंच लागेल. आणि लोकांची कामे पूर्ण करा. लोकांची कामे होणार नसेल तर खुर्ची खाली करावी लागेल, असा इशारा वजा सज्जड दम अजितदादांनी जाहीरपणे बोलताना दिला.



चिंतन शिबिरातून 'नागपूर डिक्लेरेशन'


अजित पवार म्हणाले की, हे शिबिर केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नसून, पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे आहे. शिबिरातून तयार होणारा आराखडा 'नागपूर डिक्लेरेशन' म्हणून मांडला जाईल. यातून धाडसी आणि ठोस निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.



जनतेला हेलपाटे मारायला लावू नका


अजित पवार यांनी सर्वधर्मसमभाव आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेनुसार पक्ष काम करत असल्याचे सांगितले. तसेच, 'सत्ता किंवा पदासाठी आम्ही महायुतीत सामील झालो नाही, तर राज्याची प्रगती व्हावी आणि ठोस निर्णय घेता यावा म्हणून आलो,' असेही त्यांनी नमूद केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि मंत्र्यांना त्यांनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आवाहन केले. 'जनतेला हेलपाटे मारायला लावू नका,' असा थेट आदेश देत त्यांनी सरकार आणि पक्ष यांच्यातील समन्वय अधिक घट्ट करण्याचे निर्देश दिले.



'जनसंवाद' मोहीम


पुढील काळात प्रत्येक कार्यकर्ता जनतेशी जोडला जावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी जनसंवादाचा कार्यक्रम घेतला जाईल, अशी घोषणा अजित पवारांनी केली. तसेच, दर महिन्याला नवीन मोहीम आणि विषय घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "