'काम होणार नसेल तर खुर्ची खाली करा': अजितदादांचा कामचुकार मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा; अजितदादा कोणावर भडकले?

नागपूर: 'लोकांची कामे होणार नसतील, तर खुर्ची खाली करा,' असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिला आहे. नागपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात बोलताना त्यांनी कामचुकार मंत्र्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.


एक दिवस पक्ष सांगतो त्यावेळी तुम्ही वेळ देऊ शकत नाही. यापुढे जबाबदारी आल्यावर भान ठेवले पाहिजे. मंत्री महोदयांना पक्षापेक्षा काम जास्त असेल तर त्यांनी आपलं पद मोकळं करायला हरकत नाही. पालकमंत्री ज्यांना मिळाले आहे त्यांनी इतर दिवशी जावंच लागेल. आणि लोकांची कामे पूर्ण करा. लोकांची कामे होणार नसेल तर खुर्ची खाली करावी लागेल, असा इशारा वजा सज्जड दम अजितदादांनी जाहीरपणे बोलताना दिला.



चिंतन शिबिरातून 'नागपूर डिक्लेरेशन'


अजित पवार म्हणाले की, हे शिबिर केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नसून, पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे आहे. शिबिरातून तयार होणारा आराखडा 'नागपूर डिक्लेरेशन' म्हणून मांडला जाईल. यातून धाडसी आणि ठोस निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.



जनतेला हेलपाटे मारायला लावू नका


अजित पवार यांनी सर्वधर्मसमभाव आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेनुसार पक्ष काम करत असल्याचे सांगितले. तसेच, 'सत्ता किंवा पदासाठी आम्ही महायुतीत सामील झालो नाही, तर राज्याची प्रगती व्हावी आणि ठोस निर्णय घेता यावा म्हणून आलो,' असेही त्यांनी नमूद केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि मंत्र्यांना त्यांनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आवाहन केले. 'जनतेला हेलपाटे मारायला लावू नका,' असा थेट आदेश देत त्यांनी सरकार आणि पक्ष यांच्यातील समन्वय अधिक घट्ट करण्याचे निर्देश दिले.



'जनसंवाद' मोहीम


पुढील काळात प्रत्येक कार्यकर्ता जनतेशी जोडला जावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी जनसंवादाचा कार्यक्रम घेतला जाईल, अशी घोषणा अजित पवारांनी केली. तसेच, दर महिन्याला नवीन मोहीम आणि विषय घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Comments
Add Comment

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे

Nanded Suicide : स्टेटस ठेवलं अन् शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी