मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' या मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर आज मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भाजपने मुंबईतील प्रतिष्ठित डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून संपर्क कार्यक्रम सुरू करत त्यांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतली.

मंगळवारी मुंबई भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केलेल्या या मोहिमेचा उद्देश मुंबईकरांशी संवाद साधून त्यांच्या मते आणि मागण्या जाणून घेणे हा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबई भाजपने वांद्रे पश्चिम येथील डब्बावाला भवन येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. डबा वितरणसाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध प्रणाली असलेल्या मुंबईतील डब्बेवाले त्यांच्या अचूकता आणि अतुलनीय सेवेसाठी ओळखल्या जातात. मुंबईततील डबेवाले ही आवज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा या उपक्रमात भाग घेणारा पहिला ग्रुप ठरला.

मुंबई भाजप अध्यक्ष आणि अंधेरी (पश्चिम) येथील आमदार अमीत साटम यांनी आरोग्य शिबिरानंतर डब्बावालांसोबत दुपारचे जेवणही घेतले. मी त्यांच्याशी थेट संवाद साधला आणि मुंबईच्या विकासासाठी त्यांची मते आणि सूचना ऐकल्या. डब्बावाला हे मुंबईच्या नोकर वर्गासाठी अत्यावश्यक सेवा देतात. त्यांची शिस्त आणि सेवा आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्य केली गेली आहे. ही मोहीम त्यांच्यापासून सुरू होणे योग्य आहे, असे आमदार अमीत साटम म्हणाले.

साटम यांनी पुढे सांगितले की, भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन सामान्य मुंबईकरांकडून अभिप्राय जमा करतील. आगामी बीएमसी निवडणुकीसाठी त्यांचा अभिप्राय आणि मते भाजपच्या जाहीरनाम्याचा भाग बनतील. आम्हाला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे, असेही आमदार अमीत साटम पुढे म्हणा

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा