मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत कावळ्यांना अन्न देऊन त्यांचा आदर केला जातो. कारण कावळ्याला पितरांचे प्रतिनिधी मानले जाते. मात्र, यंदा मुंबईसह अन्य शहर परिसरात कावळ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. याआधी चिमण्या नामशेष झाल्या. आता कावळे देखिल कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे पितृपक्षाच्या विधी करताना कावळ्यांच्या ऐवजी इतर पक्ष्यांना अन्न देण्याची गरज भासत आहे.


पर्यावरणातील असंतुलन, झाडतोड, वाढती नागरीकरण आणि रेडिएशन यामुळे कावळ्यांसह अनेक पक्ष्यांच्या निवासस्थानांचा नाश होतो आहे. प्राणीप्रेमी आणि पर्यावरणतज्ञांची चिंता वाढली आहे, कारण जर ही स्थिती अशीच राहिली तर भविष्यात कावळे केवळ आठवणीत आणि छायाचित्रांमध्ये पाहायला मिळतील.


आपण निसर्गाचा भाग आहोत आणि निसर्गाशिवाय जीवन अशक्य आहे. चिमणी, कावळा आणि इतर पक्ष्यांची संख्या कमी होणे म्हणजे पर्यावरणाचा असंतुलन वाढणे होय. आपण आपल्या परिसरातील झाडे व निसर्गाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.


उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी पदार्थ वापरणे टाळा. हे पदार्थ माती, पाणी आणि पर्यावरणासाठी घातक आहेत. तसेच इतर प्राणी आणि पक्ष्यांनाही धोका निर्माण करतात.


पर्यायी, नैसर्गिक व सुरक्षित उपायांचा वापर करा, जेणेकरून पर्यावरणाचा आणि आपल्या आरोग्याचा रक्षण होईल. प्रत्येकाने पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून पितृपक्षाच्या या पवित्र काळात पूर्वजांना अभिमान वाटेल आणि निसर्गही समृद्ध होईल.


आपली लहानशी जबाबदारी बदल घडवू शकते. झाडे लावा, कचरापेटीचा योग्य वापर करा, आणि पर्यावरणाचा सन्मान करा.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात