मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत कावळ्यांना अन्न देऊन त्यांचा आदर केला जातो. कारण कावळ्याला पितरांचे प्रतिनिधी मानले जाते. मात्र, यंदा मुंबईसह अन्य शहर परिसरात कावळ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. याआधी चिमण्या नामशेष झाल्या. आता कावळे देखिल कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे पितृपक्षाच्या विधी करताना कावळ्यांच्या ऐवजी इतर पक्ष्यांना अन्न देण्याची गरज भासत आहे.


पर्यावरणातील असंतुलन, झाडतोड, वाढती नागरीकरण आणि रेडिएशन यामुळे कावळ्यांसह अनेक पक्ष्यांच्या निवासस्थानांचा नाश होतो आहे. प्राणीप्रेमी आणि पर्यावरणतज्ञांची चिंता वाढली आहे, कारण जर ही स्थिती अशीच राहिली तर भविष्यात कावळे केवळ आठवणीत आणि छायाचित्रांमध्ये पाहायला मिळतील.


आपण निसर्गाचा भाग आहोत आणि निसर्गाशिवाय जीवन अशक्य आहे. चिमणी, कावळा आणि इतर पक्ष्यांची संख्या कमी होणे म्हणजे पर्यावरणाचा असंतुलन वाढणे होय. आपण आपल्या परिसरातील झाडे व निसर्गाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.


उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी पदार्थ वापरणे टाळा. हे पदार्थ माती, पाणी आणि पर्यावरणासाठी घातक आहेत. तसेच इतर प्राणी आणि पक्ष्यांनाही धोका निर्माण करतात.


पर्यायी, नैसर्गिक व सुरक्षित उपायांचा वापर करा, जेणेकरून पर्यावरणाचा आणि आपल्या आरोग्याचा रक्षण होईल. प्रत्येकाने पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून पितृपक्षाच्या या पवित्र काळात पूर्वजांना अभिमान वाटेल आणि निसर्गही समृद्ध होईल.


आपली लहानशी जबाबदारी बदल घडवू शकते. झाडे लावा, कचरापेटीचा योग्य वापर करा, आणि पर्यावरणाचा सन्मान करा.

Comments
Add Comment

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय