मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत कावळ्यांना अन्न देऊन त्यांचा आदर केला जातो. कारण कावळ्याला पितरांचे प्रतिनिधी मानले जाते. मात्र, यंदा मुंबईसह अन्य शहर परिसरात कावळ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. याआधी चिमण्या नामशेष झाल्या. आता कावळे देखिल कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे पितृपक्षाच्या विधी करताना कावळ्यांच्या ऐवजी इतर पक्ष्यांना अन्न देण्याची गरज भासत आहे.


पर्यावरणातील असंतुलन, झाडतोड, वाढती नागरीकरण आणि रेडिएशन यामुळे कावळ्यांसह अनेक पक्ष्यांच्या निवासस्थानांचा नाश होतो आहे. प्राणीप्रेमी आणि पर्यावरणतज्ञांची चिंता वाढली आहे, कारण जर ही स्थिती अशीच राहिली तर भविष्यात कावळे केवळ आठवणीत आणि छायाचित्रांमध्ये पाहायला मिळतील.


आपण निसर्गाचा भाग आहोत आणि निसर्गाशिवाय जीवन अशक्य आहे. चिमणी, कावळा आणि इतर पक्ष्यांची संख्या कमी होणे म्हणजे पर्यावरणाचा असंतुलन वाढणे होय. आपण आपल्या परिसरातील झाडे व निसर्गाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.


उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी पदार्थ वापरणे टाळा. हे पदार्थ माती, पाणी आणि पर्यावरणासाठी घातक आहेत. तसेच इतर प्राणी आणि पक्ष्यांनाही धोका निर्माण करतात.


पर्यायी, नैसर्गिक व सुरक्षित उपायांचा वापर करा, जेणेकरून पर्यावरणाचा आणि आपल्या आरोग्याचा रक्षण होईल. प्रत्येकाने पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून पितृपक्षाच्या या पवित्र काळात पूर्वजांना अभिमान वाटेल आणि निसर्गही समृद्ध होईल.


आपली लहानशी जबाबदारी बदल घडवू शकते. झाडे लावा, कचरापेटीचा योग्य वापर करा, आणि पर्यावरणाचा सन्मान करा.

Comments
Add Comment

डॉ. गौरी पालवेच्या पार्थिवावर अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; अंत्यसंस्कारादरम्यान वडिलांचा आक्रोश, "तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या"

अहिल्यानगर : पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जेच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या

इंटरलॉकिंग कामासाठी मध्यरेल्वेच्या 'या' स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक! जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा - बीव्हीटी यार्ड, तसेच कल्याण – लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding.... एकाच दिवशी दोन धक्के…स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली

सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा सांगलीत २३

पुण्यातील सायकल स्पर्धेनिमित्त सिंहगड किल्ल्यावर जाणारी वाहतूक पुढील ३ दिवस बंद, पर्यटकांना पायी मार्ग वापरण्याचा पर्याय

पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ला नेहमीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र राहिला आहे. मात्र आजपासून पुढील ३ दिवस सिंहगड

‘युनेस्को’च्या वर्ल्ड बुक कॅपिटल या दर्जासाठी पुण्याची दावेदारी

पुणे : ‘युनेस्को’च्या ‘जागतिक पुस्तक राजधानी’ (वर्ल्ड बुक कॅपिटल) या दर्जासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात! ट्रक चालकाचा ताबा सुटला अन् बॅरियर ओलांडत थेट चारचाकीवर उलटला

मुंबई: पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील