मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत कावळ्यांना अन्न देऊन त्यांचा आदर केला जातो. कारण कावळ्याला पितरांचे प्रतिनिधी मानले जाते. मात्र, यंदा मुंबईसह अन्य शहर परिसरात कावळ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. याआधी चिमण्या नामशेष झाल्या. आता कावळे देखिल कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे पितृपक्षाच्या विधी करताना कावळ्यांच्या ऐवजी इतर पक्ष्यांना अन्न देण्याची गरज भासत आहे.


पर्यावरणातील असंतुलन, झाडतोड, वाढती नागरीकरण आणि रेडिएशन यामुळे कावळ्यांसह अनेक पक्ष्यांच्या निवासस्थानांचा नाश होतो आहे. प्राणीप्रेमी आणि पर्यावरणतज्ञांची चिंता वाढली आहे, कारण जर ही स्थिती अशीच राहिली तर भविष्यात कावळे केवळ आठवणीत आणि छायाचित्रांमध्ये पाहायला मिळतील.


आपण निसर्गाचा भाग आहोत आणि निसर्गाशिवाय जीवन अशक्य आहे. चिमणी, कावळा आणि इतर पक्ष्यांची संख्या कमी होणे म्हणजे पर्यावरणाचा असंतुलन वाढणे होय. आपण आपल्या परिसरातील झाडे व निसर्गाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.


उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी पदार्थ वापरणे टाळा. हे पदार्थ माती, पाणी आणि पर्यावरणासाठी घातक आहेत. तसेच इतर प्राणी आणि पक्ष्यांनाही धोका निर्माण करतात.


पर्यायी, नैसर्गिक व सुरक्षित उपायांचा वापर करा, जेणेकरून पर्यावरणाचा आणि आपल्या आरोग्याचा रक्षण होईल. प्रत्येकाने पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून पितृपक्षाच्या या पवित्र काळात पूर्वजांना अभिमान वाटेल आणि निसर्गही समृद्ध होईल.


आपली लहानशी जबाबदारी बदल घडवू शकते. झाडे लावा, कचरापेटीचा योग्य वापर करा, आणि पर्यावरणाचा सन्मान करा.

Comments
Add Comment

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम

पुणे : तत्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी

शेतकऱ्यांना पीक विम्याचे हेक्टरी १७ हजार ५०० रुपये मिळणार; पण काय सांगतो नियम आणि शेतकऱ्यांना मिळणार किती फायदा ?

पुणे : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके

Pench : पेंच व्याघ्र प्रकल्पात आता 'सोलर बोट'ची सफारी लवकरचं पर्यटकांच्या सेवेत!

किरंगीसरा ते नवेगाव खैरी दरम्यान धावणार पर्यावरणपूरक 'सोलर बोट' पेंच : निसर्गप्रेमी आणि वन्यजीव पर्यटकांसाठी एक

शिल्पांच्या माध्यमातून राम सुतारांची कला शतकानुशतके स्मरणात राहील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण, डॉ. राम सुतार यांचे बुधवारी (१७ डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यांच्या

शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड - उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा प्रतिभावान शिल्पकार गमावला - उपमुख्यमंत्री अजित