Asia Cup 2025 : सुपर 4 मध्ये पोहोचताच टीम इंडियाला मिळाली आनंदाची आणखी एक बातमी

मुंबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळत असलेला भारतीय संघ एशिया कप 2025 च्या सुपर 4 फेरीत पोहोचला आहे. आता भारत आणि ओमान १९ सप्टेंबरच्या शुक्रवारी साखळी सामना रंगणार आहे. ओमानचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपले आहे. यामुळे हा सामना म्हणजे निव्वळ औपचारिकता आहे. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाला एक आनंदाची बातमी कळली आहे.

आयसीसीच्या टी २० क्रिकेटच्या ताज्या रेटिंगनुसार भारतीय संघ क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. भारताकडे २७१ रेटिंग आहेत. फलंदाजांच्या ताज्या रेटिंगनुसार भारताचा अभिषेक शर्मा ८८४ रेटिंगसह अव्वल स्थानी आहे. गोलंदाजांच्या ताज्या रेटिंगनुसार भारताचा वरुण चक्रवर्ती ७३३ रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. वरुणने एकदम तीन स्थानांची झेप घेतली आहे.

एशिया कप 2025 मधील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने १३ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकार मारत ३१ धावा केल्या होत्या तर वरुण चक्रवर्तीने चार षटकांत २४ धावा देत फहीम अश्रफला पायचीत (LBW) केले होते. फहीम १४ चेंडूत ११ धावा करुन परतला होता. याआधी वरुणने यूएई विरुद्धच्या सामन्यात दोन षटकांत चार धावा देत मोहम्मद झोहेबला बाद केले होते. मोहम्मद झोहेब पाच चेंडूत दोन धावा केल्यानंतर वरुणच्या गोलंदाजीवर कुलदीप यादवकडे झेल देऊन परतला होता. वरुणने लागोपाठच्या दोन सामन्यात चमकदार कामगिरी केली. याचा त्याला आयसीसी रेटिंगमध्ये फायदा झाला.

वरुण चक्रवर्ती फेब्रुवारी २०२५ मध्ये दुसऱ्या स्थानावर होता. मार्च २०२५ पासून न्यूझीलंडचा जेकब डफी टी २० क्रिकेटमध्ये गोलंदाजंच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आणि वरुण च्कवर्ती दुसऱ्या स्थानी अशी स्थिती झाली. अखेर आशिया कपमध्ये कामगिरीत सातत्य राखल्यामुळे वरुणच्या टी २० क्रिकेटच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे.
Comments
Add Comment

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही