Asia Cup 2025 : सुपर 4 मध्ये पोहोचताच टीम इंडियाला मिळाली आनंदाची आणखी एक बातमी

मुंबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळत असलेला भारतीय संघ एशिया कप 2025 च्या सुपर 4 फेरीत पोहोचला आहे. आता भारत आणि ओमान १९ सप्टेंबरच्या शुक्रवारी साखळी सामना रंगणार आहे. ओमानचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपले आहे. यामुळे हा सामना म्हणजे निव्वळ औपचारिकता आहे. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाला एक आनंदाची बातमी कळली आहे.

आयसीसीच्या टी २० क्रिकेटच्या ताज्या रेटिंगनुसार भारतीय संघ क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. भारताकडे २७१ रेटिंग आहेत. फलंदाजांच्या ताज्या रेटिंगनुसार भारताचा अभिषेक शर्मा ८८४ रेटिंगसह अव्वल स्थानी आहे. गोलंदाजांच्या ताज्या रेटिंगनुसार भारताचा वरुण चक्रवर्ती ७३३ रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. वरुणने एकदम तीन स्थानांची झेप घेतली आहे.

एशिया कप 2025 मधील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने १३ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकार मारत ३१ धावा केल्या होत्या तर वरुण चक्रवर्तीने चार षटकांत २४ धावा देत फहीम अश्रफला पायचीत (LBW) केले होते. फहीम १४ चेंडूत ११ धावा करुन परतला होता. याआधी वरुणने यूएई विरुद्धच्या सामन्यात दोन षटकांत चार धावा देत मोहम्मद झोहेबला बाद केले होते. मोहम्मद झोहेब पाच चेंडूत दोन धावा केल्यानंतर वरुणच्या गोलंदाजीवर कुलदीप यादवकडे झेल देऊन परतला होता. वरुणने लागोपाठच्या दोन सामन्यात चमकदार कामगिरी केली. याचा त्याला आयसीसी रेटिंगमध्ये फायदा झाला.

वरुण चक्रवर्ती फेब्रुवारी २०२५ मध्ये दुसऱ्या स्थानावर होता. मार्च २०२५ पासून न्यूझीलंडचा जेकब डफी टी २० क्रिकेटमध्ये गोलंदाजंच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आणि वरुण च्कवर्ती दुसऱ्या स्थानी अशी स्थिती झाली. अखेर आशिया कपमध्ये कामगिरीत सातत्य राखल्यामुळे वरुणच्या टी २० क्रिकेटच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे.
Comments
Add Comment

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने