...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर


मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला. रविवार १४ सप्टेंबरच्या रात्रीपासून सोमवार १५ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये जोरदार पाऊस झाला. विश्रांतीनंतर मुंबईत इतका जास्त पाऊस पडण्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पुढील दोन ते तीन दिवस अतिजोरदार पावसाची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. राज्याच्या घाट क्षेत्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानमधून सुरू झाला आहे. यंदा तीन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान चारही विभागात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिजोरदार तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळेच मुंबई आणि आसपासच्या शहरांतील पावसाचा जोर वाढला आहे. पावसासोबत ताशी ३० ते ४० किमी. वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आणखी दोन चार दिवस पावसाचा जोर असेल, नंतर पावसाचा जोर ओसरेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात पुढील ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


पावसाचा जोर वाढल्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने या स्थितीची तातडीने दखल घेतली आहे. नियमानुसार आवश्यक त्या प्रक्रियेअंती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले.


Comments
Add Comment

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र

सागरी सुरक्षेसाठी आणखी १० ड्रोन खरेदी करा!

मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; संवेदनशील लँडिंग पॉईंट्सवर सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि 'सागर मित्र' नेमणार मुंबई

Metro-9 from Dahisar to Mira Bhayandar दहिसर ते मीरा भाईंदर 'मेट्रो-९'ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू; वाहतूक कोंडीतून होणार सुटका मुंबई :

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.