बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू


पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू हळू सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी रालोआ (एनडीए) विरोधात मोठी यात्रा काढला. राहुल गांधींना उन्हातान्हात फिरवण्यात आले. पण यात्रा झाल्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रीय जनता दलच्या तेजस्वी यादव यांनी त्यांचे मूळ रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे.


बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल सर्वच्या सर्व २४३ जागा लढवणार, असे तेजस्वी यादव यांनी जाहीर केले आहे. यामुळे बिहारमध्ये राजदसोबत यात्रा काढणाऱ्या काँग्रेसची राजकीय कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या काँग्रेसला राजदने उल्लू बनवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


मुझफ्फरपूर येथे झालेल्या जाहीर सभेत राजद नेते तेजस्वी यादव यांनी २४३ जागा लढवण्याची घोषणा केली. माझे नाव डोळ्यांपुढे आणा आणि मतदान करा. बिहारला पुढे नेण्यासाठी काम करणार, असेही तेजस्वी यादव म्हणाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत मतदार हक्क यात्रा काढल्यानंतर तेजस्वी यादव यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल सर्वच्या सर्व २४३ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले.


बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल हा सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. नुकत्याच काढलेल्या यात्रेमुळे पक्षाविषयीची विश्वासार्हता वाढली आहे. यामुळेच सर्व जागा लढवण्याचे नियोजन सुरू असल्याचे तेजस्वी यादव यांनी जाहीर केले.


Comments
Add Comment

Vietnamese President To Lam : व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी पंतप्रधान मोदींची हैदराबाद हाऊसमध्ये भेट

नवी दिल्ली : तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी आज हैदराबाद हाऊस येथे

Shimla Court : शिमला येथे न्यायालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय उडवण्याची धमकी

“दिल्लीपर्यंत आवाज जाईल” असा पोस्टरमधून इशारा, सुरक्षा यंत्रणा सतर्क शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला येथील तीन

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’चा अपमान करणे आता गंभीर गुन्हा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कायद्यात दुरुस्ती

नवी दिल्ली : देशभक्तीशी निगडित प्रतीकांचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘वंदे

Supreme Court News : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढणार; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील न्यायव्यवस्था अधिक सक्षम आणि जलद करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचललं आहे.

Scooter Blast Near BSF Headquarters : BSF मुख्यालयाजवळ स्कूटरचा स्फोट; जालंधरमध्ये खळबळ, सर्व बाजूंनी तपास सुरू

पंजाब : पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल (BSF) मुख्यालयाजवळ अचानक स्कूटरचा स्फोट झाल्याची धक्कादायक

Bharat Electronics Limited : संरक्षण मंत्रालयाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 1476 कोटींचा करार

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी किमान पाच ग्राउंड-बेस्ड मोबाईल इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या