भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास


नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत तिने पोलंडच्या पॅरिस ऑलिंपिकची रौप्यपदक विजेती ज्युलिया सेरेमेटाचा (Julia Szeremeta) ४-१ अशा मोठ्या फरकाने पराभव करून भारतासाठी स्पर्धेतले पहिले सुवर्णपदक जिंकले.


लिव्हरपूल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत जैस्मिन पहिल्या राऊंडमध्ये थोडी पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर तिने जोरदार पुनरागमन केले. याआधी उपांत्य फेरीत तिने व्हेनेझुएलाच्या कॅरोलिना अल्काला (Carolina Alcala) हिचा ५-० ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. हा विजय तिच्यासाठी केवळ एक पदकच नव्हता, तर भारतीय महिला बॉक्सिंगसाठी एक मोठा टप्पा होता.


याच स्पर्धेत भारताच्या नुपूर श्योराणने ८०+ किलो वजनी गटात आणि पूजा राणीने ८० किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे, तर मीनाक्षी हुड्डा देखील ४८ किलो वजनी गटात पदक निश्चित करण्यात यशस्वी झाली आहे.


Comments
Add Comment

T20 World Cup 2026 : इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी खेळाडूंनी घेतला बाप्पाचा आशीर्वाद

मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील काही क्रिकेपटूंनी मुंबईतील

T20 World Cup : खेळाडूवर दुःखाचा डोंगर; रिंकू नंतर आणखी एका खेळाडूच्या वडिलांचे निधन

मुंबई : वर्ल्ड कपचा अंतिम सामना जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतशी प्रेक्षकांमध्ये सामन्याबद्दलची उत्सुकता वाढली

Smriti Mandhana : कौतुकास्पद! स्मृती मानधना पुन्हा ठरली आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल

आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना एकदिवसीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.