IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज


मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर्वात जुन्या व तीव्र क्रीडा प्रतिस्पर्धत गणला जातो. जेवहा जेव्हा हे दोन्ही संघ आमने-सामने उभे ठाकतात, तेव्हा तो केवळ एक सामना नसून तो इतिहास, भावना आणि अपक्षा यांचा संघर्ष असतो. रविवारी, दि. १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणारी आशिया चषक स्पर्धेतील लढत पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवणार आहे.


आकडेवारीपासून ते सध्याच्या कामगिरीपर्यंत भारताचे पाकिस्तानवर पारडे जड असल्याचे दिसून येते; परंतु हा हायवोल्टेज सामना असून इथे प्रत्येक षटक आणि प्रत्येक धाव एक नवा इतिहास रचते. आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानवर भारताचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या १६ विश्वचषक सामन्यांपैकी १५ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. यात एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये आठ सामने झाले, ते सर्वच्या सर्व भारताने जिंकले आहेत.


टी-२० विश्ववषकात देखील आठ सामने खेळवण्यात आल असून त्यातील ७ सामने भारताने तर १ सामना पाकिस्तानने जिंकला आहे. १९८४ पासून आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १६ आशिषा चषकांमध्ये भारत आणि पाकिस्तान मांच्यात १८ सामने झाले आहेत. यापैकी १० सामन्यांमध्ये भारताने, तर ६ सामन्यांमध्ये पाकिस्तानने विजय मिळवला आहे.


शुक्रवारी पाकिस्तानने ओमानविरुद्ध या स्पर्धेतील पहिला साना खेळताना ९३ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर सलमान आमा बोलताना म्हणाला, फलंदानीत आम्हाला अद्यापही सुधारणा कराव्या लागतील, गोलंदाजी शानदार होती. मी गोलंदाजीसाठी खुश आहे, आमच्याकडे तीन फिरकीपटू आहेत आणि तिघेही वेगवेगळे आहेत.


एकदिवसीय १८ सामने


भारत विजयी: ५० सामने


पाकिसतान विजयी ६ सामने


निकाल लागला नाही: २ सामने



टी-२० : ८ सामने


भारनिजयी: ॥ सामने


पाकिस्तान १ सामना



आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ कोणता?


भारत - ८ विजेतेपदे (१९८४,


१९८८, १९१०-११, १९९५ २०१०, २०१६, २०१८, २०२३)


श्रीलंका - ६ विजेतेपदे


पाकिस्तान- २ विजेतेपदे



गेल्या पाच वर्षांची स्थिती


सप्टेंबर २०२० पासून ते सप्टेंबर २०२५ पर्यंग, दोन्ही संघानी टी-२० स्वरूपात ५ वेळा एकमेकांचा सामना केला आहे. यापैकी भारत ३-२ अशा फरकाने पुढे आहे. ही अलीकडील कामगिरी भारताचा आत्मविश्वास वाढवते.



Comments
Add Comment

IPL Playoff 2026 : RCB, GT, SRH आणि राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये दाखल

मुंबई : आयपीएल २०२६ च्या अंतिम टप्प्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात राजस्थान रॉयल्सने

IPL मध्ये लाजिरवाणी घटना! चिअरलिडर्ससोबत दुर्व्यवहार ; मैदानातच रंगला हायव्होल्टेज ड्रामा

LSG VS PBKS : आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यादरम्यान एक अत्यंत

IPL प्रसारणामधील “सलाम मुंबई” ऐवजी “नमस्कार मुंबई” प्रदर्शित करण्याची भाजयुमो, मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांची मागणी

IPL  2026 : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष श्री दिपक सिंह यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री

Sara Tendulkar : अर्जुनच्या पदार्पणाने तेंडुलकर कुटुंब भावूक; बहिण सारा आणि पत्नी सानियाची खास पोस्ट चर्चेत

IPL 2026 LSG VS PBKS : आयपीएल २०२६ मध्ये अखेर सचिन तेंडुलकरच्या मुलाला लखनउ सुपर जायंट्सकडून खेळण्याची संधी मिळाली.

KKR vs DC : आज आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्ध केकेआर आमने सामने, केकेआरकडे प्लेऑफमध्ये जाण्याची शेवटची संधी

IPL 2026 : आयपीएल 2026 मधील लीग टप्प्यातील अखेरचा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार

IPL 2006 : कोलकातासाठी विजय अनिवार्य

- सुशील परब कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२६ मधील साखळी फेरीतील महत्त्वाचा सामना