बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश


मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत हद्द कायमचे बनावट नकाशे बनवण्याबाबत जो अहवाल तयार करण्यात आला आहे, त्याचा शासनाने फेर विचार करावा, तसेच बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले.


कांदिवली, मालाड आणि बोरीवली येथील आर नॉर्थ, आर साऊथ, आर सेंट्रल आणि आर मध्य या महापालिका वार्डमधील ३५० हून अधिक सीटीएस वरील रहिवाशांची घरे, इमारती, बांधकामे, गावठाणे आणि चाळींनाही अनधिकृत ठरवून नोटीस. बजावण्यात आली आहे. याबाबत स्थानिक आमदार आणि रहिवाशांच्या ज्या तक्रारी आल्या होत्या म्हणून आज मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी बैठक घेतली. मुंबई महानगरपालिकेच्या बोरीवली येथील आर मध्य विभागात ही बैठक पार पडली.


सदर बैठकीमध्ये पालकमंत्री शेलार यांनी असे निर्देश दिले की एसआयटी चौकशी मर्यादित तक्रारीसाठी आहे, त्याचा संदर्भ घेऊन इतर नागरिकांना त्रास देऊ नये. तसेच सदर नकाशा मध्ये स्कॅनिंगच्या वेळी जर फेरफार करण्यात आले असेल तर संबंधित कंत्राटदार आणि त्या कंत्राटदाराला नियुक्त करणारे अधिकारी यांची देखील चौकशी झाली पाहिजे, असे निर्देश पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले .


साडे नऊशेहुन अधिक स्ट्रक्चर्स, इमारती, चाळी, गावठाणांना नोटीस देण्यात आल्या आहेत. नकाशामध्ये जे फेरफार करण्यात आले ते चूकीचे असल्याने नाहक त्रास होत होता. त्याच्यामध्ये शासनाने कमिटी अपॉइंट करून त्यानंतर अहवाल दिला होता. शासनाच्या अहवालानंतर एसआयटी सुद्धा स्थापन झाली होती. ही चौकशी सुद्धा एका बाजूला चालू आहे. पण या सगळ्या घटनांमध्ये सीआरझेड आणि एनडीझेड बाहेरच्या नागरिकांना नाहक त्रास होतो आहे. आणि म्हणून जो अहवाल हे सगळं सांगतो त्याचा फेर विचार करण्यात यावा, असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले. ही मागणी या विभागातील लोकप्रतिनिधीनी केली होती.

सदर बैठकीस माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, आमदार मनिषाताई चौधरी, गणेश खणकर, बाळा तावडे व प्रशासनातील नगरविकास, महसूल, जमाबंदी आयुक्त, भूमिअभिलेख व बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१