निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ


निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना अतिरिक्त ५ ते १० गुण देण्याचा निर्णय घेतला. निवड प्रक्रियेत निकालानंतर फेरफार केल्याने नियुक्तीमध्ये गैरव्यवहार होण्याची शंका उमेदवारांकडून व्यक्त होत आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक, गुणवत्तापूर्वक करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.


मुंबई : प्रभाग कार्यालयांमधील वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाच्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराला आळा घालण्यााठी यंदा मुंबई महानगरपालिकेने परीक्षा पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला. भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल लागून जवळपास ४५ दिवस उलटले. मात्र अद्यापही महानगरपालिकेकडून भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. भरती प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे उमेदवार संतप्त झाले असून, त्यामध्ये गैरव्यवहार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे पद महत्त्वपूर्ण समजले जाते. खाद्यपदार्थ विक्री परवाने, सश्रुषागृह परवानगी आणि इतर सार्वजनिक आरोग्यविषयक परवाने आदी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे असतात. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामधील हे पदे मागील अनेक वर्षांपासून अंतर्गत भरतीद्वारे मुलाखतीच्या माध्यमातून भरले जात होते. मात्र त्यामध्ये गैरव्यवहार व भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंदा प्रथमच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० ऑक्टोबरला परीक्षा झाली. ही परीक्षा सकाळी ११ वाजता होणार होती. मात्र ती दुपारी घेण्यात आली. तसेच ही परीक्षा ऑनलाईनऐवजी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली.


परीक्षेच्या वेळी अचानक करण्यात आलेल्या या बदलामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. परीक्षा झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे उत्तीर्ण उमेदवारांना लवकरच भरती होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र निकाल लागून ४५ दिवस उलटले तरी मुंबई महानगरपालिकेने याबाबत पुढील प्रक्रिया राबवलेली नाही. यामुळे उमेदवार संतप्त झाले आहेत. परिक्षेच्या निकालानंतर तब्बल दीड महिन्यांचा कालावधी लोटला तरी प्रशासन ना भरती करत आहे, ना भरती विलंबाबाबत जाहीरपणे कोणतेही स्पष्टीकरण देत नाही, यामुळे उमेदवारांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य विभागात पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. लवकरच भरती प्रक्रिया न राबविली गेल्यास उमेदवार न्यायालयाचेही दरवाजे ठोठावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार मोठा आहे. मनपा कार्यक्षेत्रातील लोकसंख्या ही देशातील काही लहान राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. या अफाट लोकसंख्येला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देताना पालिकेच्या रुग्णालयीन स्थानिक व्यवस्थापणाला तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कमालीच्या तणावाखाली काम करावे लागत आहे, तरी भरतीस मनपा विलंब करत आहे.


यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे आणि उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. ओमप्रकाश वाल्लेपवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.


Comments
Add Comment

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण