Nitesh Rane on Nashik Tree Cutting : 'वृक्षतोडीवर आक्षेप, मग बकरी कापताना गप्प का?' पर्यावरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंचा तिखट सवाल!

मुंबई : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Kumbh Mela 2027) च्या भव्य तयारीला सुरुवात झाली असताना, साधूग्राम उभारणीसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरून राजकारण सुरू आहे. ११५० एकरांवर साधूग्रामसाठी १८०० झाडे तोडण्याच्या योजनेवर तथाकथित पर्यावरणवादी आणि राजकीय नेत्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी मात्र धैर्य दाखवून एक खडा आणि तिखट प्रश्न विचारत विरोधकांचा ढोंगीपणा उघड केला आहे. मंत्री नितेश राणे यांनी आपल्या 'एक्स' (X) सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट करत पर्यावरणवाद्यांच्या भूमिकेवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी तोच ज्वलंत प्रश्न उपस्थित केला आहे, जो सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. राणे यांनी म्हटले आहे की, "तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का? सर्व धर्म सम भाव?"





राणे यांच्या या वक्तव्याने स्पष्ट केले आहे की, विरोधकांचा हा विरोध पर्यावरणापेक्षा अधिक राजकीय हेतूने प्रेरित आहे. जेव्हा एखादा धर्म आणि त्याची श्रद्धा येते, तेव्हा गप्प बसणारे हे 'पर्यावरणवादी' हिंदू धर्माच्या सर्वात मोठ्या कुंभमेळ्याच्या तयारीच्या आडकाठी आणत आहेत. नितेश राणे यांनी 'सर्व धर्म समभाव'ची व्याख्या केवळ सोयीनुसार वापरणाऱ्यांना आव्हान दिले आहे. तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा तापलेला असताना, मंत्री नितेश राणे यांच्या या सत्यशोधक वक्तव्यामुळे विरोधकांना आता आपल्या भूमिकेवर विचार करण्यास भाग पाडले आहे. त्यांच्या या प्रश्नावर विरोधकांकडून आता कोणती प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा

विभागातील नागरी कामांसोबतच सहायक आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य इमारतींची जबाबदारी

रुग्णालय, दवाखाना परिसर अतिक्रमण मुक्त ठेवून स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे निर्देश रुग्णालयांमधील कामांवर सहायक

पीपीपी धोरणांतर्गत वाटप केलेल्या ५ शाळांच्या भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करा

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना पत्र मुंबई : शाळांसाठी राखीव असलेले

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती

नाशिकमधील 'कॉर्पोरेट जिहाद'नंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये

 सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये होणार झाडाझडती; महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पॉश’ कायद्याची कठोर अंमलबजावणी मुंबई

Amruta Fadanvis : रेड कार्पेटची वाट पाहता येईल, पण माझा देश नेहमीच प्रथम!" पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अमृता फडणवीसांचा 'कान्स' दौरा रद्द

मुंबई : सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, देशातील जनतेने अनावश्यक परदेश वाऱ्या टाळाव्यात, इंधनाची