सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार


नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. ‘जेन-झी’ने सुरू केलेल्या निदर्शनांने उग्र स्वरूप धारण केल्यानंतर अखेर के. पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता नेपाळच्या माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांनी नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून शुक्रवारी शपथ घेतली आहे.


नेपाळच प्रमुखपद स्वीकारण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आल्यानंतर सुशीला कार्कींच्या नावाची चर्चा समोर आली होती. मात्र, या पदासाठी सुशीला कार्की यांनी आधी नकार दिला होता. दरम्यान, त्यानंतर सुशीला कार्की यांची लष्कर प्रमुख सिगदेल धपासी यांनी त्यांची मनधरणी केली. आंदोलकांकडून कार्कींना अधिकृत विनंती अर्जही देण्यात आला होता. पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद येत नव्हता.



नेपाळमध्ये संकटकाळाची घोषणा होण्याची शक्यता


देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, आणीबाणी लागू करण्याची घोषणा होऊ शकते. हंगामी सरकारच्या शिफारशीनुसार, राष्ट्रपती रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण नेपाळमध्ये आणीबाणी जाहीर करू शकतात. नेपाळच्या संविधानाच्या कलम २७३ नुसार, जर देशात कोणत्याही प्रकारची आपत्ती, युद्ध, नैसर्गिक आपत्ती किंवा सशस्त्र बंडखोरी झाल्यास, अशा परिस्थितीत देशात जास्तीत जास्त ६ महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली जाऊ शकते. या काळात, संपूर्ण देशाची सुरक्षा व्यवस्था लष्कराच्या हातात येते.

Comments
Add Comment

इराणमधील आंदोलनांमध्ये ३ हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी

तेहरानत्र : इराणमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची

मोदींप्रती मला आदर; ते माझे जवळचे मित्र!

दावोसमधील आर्थिक परिषदेत ट्रम्प यांच्यांकडून कौतुकाचा वर्षाव दावोस: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली आहे. जानेवारी २०२५ मध्येच ट्रम्प प्रशासनाने जागतिक

Pakistan Karachi Massive Fire : पाकिस्तानमध्ये अग्नितांडव! अख्खी इमारत जळून खाक, तब्बल 'इतक्या' जणांचा होरपळून मृत्यू

कराची : पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहरात एका बहुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण देश

भरत गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा अभिमान : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सामंजस्य करारानंतर वर्षभरात उद्योग उभारणीचे दावोस येथे कौतुक दावोस : “जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक

वीस वर्षांची सवय ठरली घातक; रोजच्या कॉफीतून शरीरात साचलं विष, अखेर ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

तैवान : तैवानमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूमागे धक्कादायक कारण समोर आलं असून, रोजच्या वापरातील एका