राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना' (PMMSY) च्या धर्तीवर, आता लवकरच राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' (Mukhyamantri Matsyasampada Yojana) सुरू केली जाणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली. येत्या जानेवारी २०२६ पासून ही योजना सुरू होईल आणि त्यामुळे मच्छिमारांना केंद्र व राज्य या दोन्ही सरकारांच्या योजनांचा लाभ घेता येईल, असे त्यांनी सांगितले.



मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा


वरळी येथे शुभम चॅरिटेबल ट्रस्ट आणि भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात बोलताना मंत्री नितेश राणे यांनी हे महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, "या सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करत आहोत, ज्यामुळे राज्यातील प्रत्येक कोळी बांधवाला विविध पद्धतीने लाभ मिळण्यास सुरुवात होईल."



आरोग्य शिबिरातून मच्छिमार महिलांना मदत


यावेळी बोलताना राणे यांनी शुभम चॅरिटेबल ट्रस्टच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, "मी मंत्री असलो तरी तुमचा सहकारी म्हणून इथे आलो आहे. तुम्हाला माझी जिथे कुठेही गरज असेल, तिथे तुम्ही नक्की मला बोलवा. कोणीही त्रास देत असेल, म्यांव म्यांव करत असेल तर लगेच मला फोन करा. त्यांचा आवाज बंद करण्याची सगळी औषधं माझ्याकडे आहेत."


या आरोग्य शिबिराच्या आयोजनाबद्दल त्यांनी भाजपचे कार्यकर्ते आणि शुभम चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानले. ते म्हणाले की, कोळी बांधव जीवाची पर्वा न करता समुद्रात मासेमारी करतात. अनेक हालअपेष्टा त्यांना सहन करावी लागते. तसेच मच्छिमार महिलांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. या शिबिरातून त्यांना आवश्यक ती आरोग्य सेवा मिळेल. मी स्वतः या शिबिराला भेट देऊन महिलांना होणारे त्रास आणि त्यांना लागणाऱ्या औषधांची माहिती घेतली.



राजकीय टोलेबाजी आणि पुढील वाटचाल


यावेळी राणे यांनी भाषणात राजकीय टोलेबाजीही केली. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, "जिथे जिथे भाजपचा कार्यकर्ता ताकदीने फिरेल, तिथे मतदारांना हा विश्वास दिला पाहिजे की त्यांचा विकास फक्त भाजपच करू शकतो. या मतदारसंघातून पुढील वेळी भाजपचा आमदार निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


मी किरणजीना सांगेल आणि आमच्या सावंत आणि सगळ्या भारतीय जनता पक्षामधील सहकाऱ्यांना सांगेल जसे आमच्या कोळी समाजाच्या महिलांच्या आरोग्याची काळजी तुम्ही घेता, तसं थोडं या मतदार संघाच्या पण लोकांच्या आरोग्य आरोग्याची काळजी घ्या. दोन टर्म पासून बिचारे फार हैराण आहेत. इथे भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून जात नाही तोपर्यंत या लोकांची आरोग्याची काळजी आपण घेऊ. निष्क्रिय आमदार या मतदार संघाला मिळाला असल्यामुळे जसे आज आपण सगळ्या जणांनी मेहनत करून दाखवून या कोळी समाजाच्या महिलांची आरोग्याची तपासणी केली, तशी पुढची चार वर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वात या मतदारसंघाच्या लोकांच्या मतदारांची पण आरोग्याची काळजी आणि भविष्याची काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या भारतीय जनता जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या खांद्यावर आहे, हे मी आवर्जून तुम्हाला सांगतो. आणि मग त्यासाठी मला तुम्ही कधीही बोलवा, कधीही सांगा, माझी तयारी आहे. पण या मतदार संघाचा वनवास या निमित्ताने तो मिटवण्याचे काम आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे. या विधानसभेला थोडक्यात वाचलेला म्हणजे काट्यावर पास झालेला विद्यार्थी आहे आणि किती म्यांव म्यांव करतो. आम्ही इथे भरघोस मतांनी निवडून आलेले तीन तीन वेळा टर्मचे आमदार आहोत आणि हा काठावर निवडून येतो आणि एवढा म्यांव म्यांव करतो. हा विकास काय म्हणतो, बाबा त्याचे स्वतःचे वडील अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, स्वतः कॅबिनेट मंत्री होता, तरी पण आपल्या मतदारसंघाची परिस्थिती बदलू शकला नाही. म्हणून एवढंच मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि त्याची झलक आणि त्याचा ट्रेलर तुम्हाला या मुंबई महापालिकेच्या निमित्ताने या मतदार संघाच्या प्रत्येक वॉर्डवर भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक म्हणून गेला पाहिजे. त्यासाठी तुम्ही कामाला लागा, असे आवाहनही मंत्री राणे यांनी केले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक वॉर्डात भाजपचा नगरसेवक निवडून आणण्याचे आवाहनही त्यांनी केले."


मंत्री राणे यांनी भाषणाचा समारोप करताना सांगितले की, "या मतदारसंघाचा वनवास संपवण्याची आणि विकासाचा मार्ग सुरू करण्याची जबाबदारी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. मी नेहमीच तुमच्यासोबत आहे आणि माझे मंत्रालय तुम्हाला लागेल तिथे मदतीसाठी कायम उपलब्ध असेल."

Comments
Add Comment

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीचं कारण जगजाहीर...

मुंबई : देशभरात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Assembly Election) प्रचंड रणधुमाळी सुरू आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर

Dharmendra Hospital Video Leak : अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत क्रिटिकल; हॉस्पिटलमधील VIDEO लीक, पत्नी प्रकाश कौर ढसाढसा रडल्या

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या नाजूक प्रकृतीमुळे संपूर्ण सिनेसृष्टीत चिंतेचे वातावरण असतानाच,

मुंबईतील उद्यान विभागाच्या निविदा होणार रद्द? महापालिका उद्यान विभागाकडून अनामत स्वीकारण्याच्या परिपत्रकाचे उल्लंघन

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील उद्यान विभागाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मागवण्यात आलेली निविदा वादात

Mangesh Desai : आता 'धर्मवीर ३' नाही, तर 'गुवाहाटी फाइल्स'? निर्माते मंगेश देसाईंच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; म्हणाले...

मुंबई : दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला आणि शिवसेनेसाठी महत्त्वाचा

डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता

करिअर : सुरेश वांदिले डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता विषयातील बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए-डीबीइ) हा

Bihar Vidhan Sabha Election Result : बिहार विधानसभा मतमोजणीला लवकरच सुरुवात; नवे सरकार आज स्थापन होण्याच्या दिशेने पहिले पाऊल...

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले असून, आज, निकालाचा 'महादिवस' आहे. आज या निवडणुकीचे