परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा


मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला मान्सून महाराष्ट्रात पुन्हा परतण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिनांक १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते, त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यभर पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.



सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात मान्सून पुन्हा झोडपणार


हवामान तज्ञांनी सूचित केले आहे की सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात परतीचा मान्सून सक्रिय होऊ शकतो. दरम्यान, आता पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.



हवामान खात्याने दिला इशारा 


हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान राज्यात मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर शुक्रवारपासून वातावरणात बदल दिसून येत आहेत आणि हवेतील आर्द्रता वाढू लागली आहे. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मान्सून परतण्याची ही सुरुवातीची चिन्हे आहेत.


गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर, पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे. ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा हवामान आल्हाददायक झाले आहे.  पुढील आठवड्यात म्हणजेच १३ ते १८ सप्टेंबर दरम्यान राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.



या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस 


हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ या सर्व ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


ढगांमुळे गेल्या काही दिवसांत आर्द्रता आणि उष्णतेत खूप वाढ झाली होती, परंतु लवकरच परतीचा पाऊस सुरू होणार असल्यामुळे लोकांना नक्कीच त्यातून दिलासा मिळेल. तथापि, सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याची, वाहतूक कोंडी होण्याची आणि पिकांचे नुकसान होण्याची देखील शक्यता आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये