गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल पाडणारच


पूल वाचवणे शक्य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे


पूल वाचवल्यास प्रकल्प खर्च आणि कालावधीही वाढणार


मुंबई : मुंबई महापालिकेने सात वर्षांपूर्वी म्हणजे सन २०१८ साली बांधलेला गोरेगाव येथील वीर सावरकर उड्डाणपूल आता विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्प कामांमध्ये अडथळा ठरत आहे. त्यामुळे हा पूल आता पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. परंतु याला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. तरी या प्रकल्प कामांमधील अडथळा ठरणाऱ्या या पुलाचे बांधकाम वाचवणे शक्यच नसल्याने हा पूल पाडल्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे या प्रकल्प कामाला गती देण्यासाठी हे पूल पाडण्यावर महापालिका पूल विभाग ठाम असल्याचे दिसून येत आहे.


गोरेगाव पश्चिमेतील वीर सावरकर उड्डाणपूल पश्चिम द्रुतगती महामार्गाला थेट जोडतो. या पुलामुळे गोरेगाव आणि मालाड परिसरातील प्रवासाचा वेळ ४५ मिनिटांवरून १० मिनिटांवर आला होता. त्यामुळे अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांची मागणी पूर्ण झाली होती. परंतु, आता हाच पूल मुंबई कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात अडथळा ठरत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. कोस्टल रोड प्रकल्पासाठी वीर सावरकर उड्डाणपूल पाडल्यानंतर त्या जागी दुमजली पूल उभारण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. या दुमजली पुलाचा वरचा भाग मालाडमधील माइंडस्पेसपासून दिंडोशी कोर्टापर्यंत पोहोचेल, तर खालचा भाग सध्याच्या वीर सावरकर उड्डाणपुलाची जागा घेईल. यामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणी मिळणार आहे. तसेच, कोस्टल रोडमधून गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर थेट प्रवेश देण्यासाठी हा दुमजली पूल महत्त्वाचा ठरेल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.


या विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्पासाठी सावरकर उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेतल्याने याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन काय निर्णय घेते आणि आराखड्यात काही बदल करते का याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र महापालिका प्रशासनाने हा पूल पाडल्याशिवाय पर्यायच नसल्याचे स्पष्ट केले. जर हे पूल तसेच ठेवून काम केल्यास विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्पाचा खर्च वाढेल आणि वेळही अधिक वाढून प्रकल्पाचे काम लांबणीवर पडेल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.


Comments
Add Comment

मुंबई, पुणेकरांनो सावधान! हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

राज्यातील १७ जिल्ह्यांना अतिमुसळधारेचा इशारा तर २० राज्यांना आठवडाभर पाऊस झोडपणार मुंबई (प्रतिनिधी): दोन

मागील २-३ वर्षांत मराठा समाजाला जास्त निधी मिळाला

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत भुजबळ आक्रमक मुंबई : ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी

मुंबईत अग्निवीरानेच रायफल चोरली, कारण काय? दोघांना तेलंगणात अटक

मुंबई : मुंबईतील नेव्ही नगरमध्ये ड्युटीवर तैनात असलेल्या अग्निवीराची (नेव्ही कर्मचारी) रायफल चोरणाऱ्या दोन फरार

दसरा मेळाव्यासाठी मुंबई मनपाकडून ठाकरे गटाला परवानगी

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी

गोरेगावच्या शालिमार इमारतीत भीषण आग, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई: गोरेगाव येथील एस. व्ही. रोडवरील एका इमारतीला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ऐन

दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या सागरी प्रदर्शन व परिषदेचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उदघाटन

पुढील तीन दिवसात नवनवीन भागीदारी आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन   मुंबई: