पूरग्रस्त पंजाबमध्ये ‘रिलायन्स’ची दहा सूत्री मदतयोजना

मुंबई : पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी रिलायन्सने येथे व्यापक दहा सूत्री मदतयोजना सुरू केली आहे. अमृतसर आणि सुलतानपूरमधील सर्वाधिक प्रभावित गावांमध्ये तातडीची मदत पोहोचवण्यासाठी 'रिलायन्सची मदत चमू कार्यरत आहे. अनेक कुटुंबांनी आपली घरे, उपजीविका गमावली आहे. रिलायन्स परिवार त्यांच्यासोबत आहे.अन्न, पाणी, माणसांबरोबरच प्राण्यांचीही काळजी घेतआहे,असे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी, म्हंटले आहे.


दहा हजारहून अधिक कुटुंबांना आवश्यक अन्नधान्य वाटण्यात आले आहे. अत्यंत असुरक्षित अशा एक हजार कुटुंबांसाठी तसेच ,विधवा महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांवर अवलंबून असलेल्या नेतृत्वाखालील कुटुंबांसाठी प्रत्येकी पाच हजार रूपयाचे व्हाउचर-आधारित सहाय्य केले जात आहे.सामुदायिक स्वयंपाकगृहांसाठी कोरड्या अन्नधान्याचा पुरवठा केला.पाणथळ भागांमध्ये सुरक्षित पिण्याचे पाणी पूरवण्यासाठी अस्थायी वॉटर फिल्टरची उभारणी केली.


निवऱ्यासाठी विस्थापित कुटुंबांचे संरक्षण करण्यासाठी ताडपत्री, ग्राउंडशीट्स, डासजाळी, दोऱ्या आणि बिछाना असलेली आपत्कालीन निवारा किट्स वाटली असून पूरानंतर होणाऱ्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य-जागरुकता सत्रे आणि पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. रिलायन्स फाउंडेशन आणि वनतारा आणि पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने औषधे, लसीकरण आणि तसेच पशुधन शिबिरे आयोजित करत आहेत आणि मृत प्राण्यांचे सन्मानपूर्वक वैज्ञानिक अंत्यसंस्कार करून संभाव्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे. रिलायन्सच मदत चमू जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक पंचायत यांच्या समन्वयाने तातडीची जीवनरक्षक मदत पोहोचवत आहे. ‘जिओ’च्या पंजाब टीमने एनडीआरएफच्या सहकार्याने पूरग्रस्त भागात नेटवर्क सुस्थापित करण्यासाठी प्रयत्न करून राज्यभर १००% विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी केली असल्याचे अनंत अंबानी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Bengaluru News : बेंगळुरू हादरले! मुलीच्या पगारावर डोळा अन् लग्नासाठी ४० लाखांचा हट्ट; विरोध करताच वडिलांनी कॉलेजमध्येच...

बेंगळुरू : आपल्या मुलाने उच्च शिक्षण घेऊन करिअरमध्ये यशस्वी व्हावे आणि आनंदाने संसार थाटावा, अशी प्रत्येक

Rajkot Accident : राजकोटमध्ये भरधाव रिक्षाने वृद्ध महिलेला दिली जाेरदार धडक, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

राजकोट : गुजरात मधील राजकोट येथील १५० फीट रिंग रोडवरील आंबेडकर चौकाजवळ एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची घटना समोर

Kanwar Yatra 2026 : २०२६ ची कावड यात्रा सुरू; जाणून घ्या तारीख, महत्त्व आणि इतर महत्त्वाची माहिती

दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो शिवभक्तांच्या आतुरतेने वाट पाहिली जाणारी कावड यात्रा (Kanwar Yatra 2026) आजपासून अधिकृतपणे

India-Pakistan POK : अमेरिकी वृत्तपत्रात ‘पाकिस्तानी काश्मीर’ असा उल्लेख, भारताने नोंदवला तीव्र आक्षेप

नवी दिल्ली : अमेरिकेतील भारतीय दूतावासाने एका अमेरिकन वर्तमानपत्राच्या वृत्ताच्या मथळ्यावर तीव्र आक्षेप

Food Safety : रंगीबेरंगी फ्रायम्स अन् पापड खात असाल तर सावधान! कर्करोग आणि किडनीचा मोठा धोका; तमिळनाडू अन्न सुरक्षा विभागाचा इशारा

चेन्नई : पापड, अप्पलम आणि तळलेले रंगीबेरंगी फ्रायम्स (Fryums) हे भारतात अतिशय आवडीने खाल्ले जाणारे अन्नपदार्थ आहेत.

Soanm Wangchuk : मोदी सरकारविरुद्ध उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांनी चक्क आता केलं मोदी सरकारचं कौतुक; जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Soanm Wangchuk)