महाराष्ट्र हे उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम राज्य

उद्योगांना आणि गुंतवणूकदारांना पोषक इको सिस्टिम राज्यात उपलब्ध


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान


मुंबई:महाराष्ट्र हे देशातील एक उद्योग स्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे सर्वोत्तम आहे. तसेच इज ऑफ ड्यूइंग बिसनेस अंतर्गत राज्यात गुंतवणूक आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां नी केले. जियो वॉर्ड ट्रेड सेंटर येथे इंडिया ऑस्ट्रेलिया फोरमच्या ग्लोबल लीडर मीट या राऊंड टेबल कॉन्फरन्स वेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या राज्य शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नेहमीच तत्पर अस ल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासन विविध क्षेत्रांविषयी नवीन आणि परिपूर्ण धोरण आखत आहे. येत्या काळात १४ क्षेत्रांसाठीची धोरणे जाहीर होणार आहेत. त्यामध्ये सेवा क्षेत्राची समावेश आहे. राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये सेवा क्षेत्राचा मो ठा वाटा आहे. उद्योजकांना गुंतवणूकदारांना अडचणी येऊ नयेत सर्व परवानग्या लवकर प्राप्त करता याव्यात या साठी मैत्री पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. ही एक खिडकी योजना (Window Scheme) असून उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करताना चांग ला अनुभव यावा यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


याविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले आहेत की, 'इज ऑफ ड्यूइंग बिसनेस मध्ये नव्याने सुधारणा करण्यात येत आहेत. गुंतवणुकीच्या नवीन संकल्पना राबवण्यात येत आहेत. राज्यात एक्सप्रेस वे चे जाळे उभारले जात आहे. वाढवण बंदरा मुळे राज्य सागरी व्यापार क्षेत्रात महत्वाचा भागीदार असणार आहे. संपूर्ण राज्यातील महत्त्वाची ठिकाणे सहा तासाच्या अंतराने वाढवण बंदराशी जोडली जात आहेत. राज्यात सांडपाणी व्यवस्थापन, त्यावरील प्रक्रिया, सौर ऊर्जा, पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये गुंतव णुकीच्या मोठ्या संधी आहेत. त्याचा ऑस्ट्रेलियातील उद्योगांनी फायदा घ्यावा. या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा. पुणे येथे नवीन विमानतळ उभारण्यात येत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल. पुण्यात जलद वाहतुकीसाठी पा याभूत सुविधांचे नवनवीन प्रकल्प उभारण्यात येत आहेत.' तसेच शासन उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक निर्णय घेत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


या राऊंड टेबल कॉन्फरन्स पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निमंत्रित व उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ऑस्ट्रेलिया हा शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य देश आहे. अनेक भारतीय विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी जातात. आता ते शि क्षण नवी मुंबई येथील एज्यू सिटी मध्ये मिळणार आहे. तसेच गोंडवाना विद्यापीठाशी कुर्निल विद्यापीठाने केलेल्या करारामुळे खाणकाम क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे शिक्षण उपलब्ध होऊन त्याचा फायदा गडचिरोली जिल्ह्यातील लोह उद्योगाला होईल. गडचिरोली ही देशा ची लोह राजधानी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पणन मंत्री जयकुमार रावल, ऑस्ट्रेलियाचे हाय कमिशनर फिलीप ग्रीन, उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगण यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मंगळवारी 'या' भागात होणार पाणी कपात

मुंबई: मुंबईकरांसाठी फार महत्वाची बातमी समोर आली आहे. मंगळवार १० फेब्रुवारी रोजी मुंबईमधल्या अनेक ठिकाणी पाणी

Russia Knife Attack: रशियामध्ये चार भारतीय विद्यार्थ्यांसह अनेकांवर चाकू हल्ला; एक गंभीर जखमी

रशिया: रशियन प्रजासत्ताक बाशकोर्तोस्तानमधील उफा येथील एका वैद्यकीय विद्यापीठात चाकू हल्ला झाला आहे. या

रितू तावडे मुंबईच्या आठव्या महिला महापौर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला नगरसेविका महापौर झाल्या आहेत. १९५५ -५६

Mumbai: परदेशात उच्च शिक्षणाच्या नावाखाली मोठी फसवणूक, आरोपी फरार

मुंबई : मुंबईत परदेशात उच्च शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आणि पालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

'सूर्या'सेनेचा विजयाचा श्रीगणेश, पहिल्याच सामन्यात अमेरिकेला चारली धूळ

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या घरच्या मैदानावर अमेरिकेचा २९ धावांनी पराभव

सूर्यकुमारने टी ट्वेंटी विश्वचषकात केला मोठा विक्रम

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात २० षटकांत नऊ बाद १६१ धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माने शून्य, ईशान