Job News : नोकरी शोधताय तर ही आहे तुमच्यासाठी बातमी

एसटीच्या रत्नागिरी विभागात ४३४ पदांची भरती


रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) रत्नागिरी विभागामध्ये शिकाऊ उमेदवार भरतीकरिता विविध कार्यशाळा व्यवसायांतर्गत ४३४ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.


या पदांकरिता अर्ज करण्यासाठी www.https://apprenticeshipindia.org/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन अर्ज राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभाग कार्यालयात ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले आहे.


या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज व राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी कार्यालयात उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन नमुना अर्ज असे दोन्ही अर्ज विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा राहील. भरती प्रक्रिया स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, भरावयाच्या जागांमध्ये वाढ किंवा घट करणे इत्यादीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार रत्नागिरीच्या विभाग नियंत्रकांकडे राहतील.


शिकाऊ उमेदवारी भरतीकरिता विविध कार्यशाळा व्यवसायांतर्गत रिक्त पदे अशी आहेत - यांत्रिक डिझेल ११०, यांत्रिक मोटारगाडी ११०, वीजतंत्री ६०, पत्राकारागीर ४४, सांधाता २५, कातारी १०, यंत्र कारागीर १०, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग ५, साठा जोडारी ४४, सुतार ४, रंगारी १०, शिवणकाम २.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी